चंद्रपूर जिल्‍हयात 12 व्‍हेंटीलेटर्स, 5 हजार पीपीई किट्स व 10 हजार एन-95 मास्‍क चा पुरवठा त्‍वरीत करावा – आ. सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

Bhairav Diwase
मास्‍क व सॅनिटायझर, पीपीई किट्स, ग्‍लोव्‍हज वरील राज्‍य वस्‍तु व सेवाकर माफ करावा

ऑटोरिक्षा चालक, असंघटीत कामगार व बांधकाम कामगारांच्‍या खात्‍यात 5 हजार रूपये जमा करावे
    Bhairav Diwase.    April 09, 2020 
(आधार न्यूज नेटवर्क चंद्रपूर तालुका प्रतिनिधी)वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्‍हयातील शासकीय रूग्‍णालयात 12 व्‍हेंटीलेटर्स, 5 हजार पीपीई किट्स व 10 हजार एन-95 मास्‍क चा पुरवठा करण्‍यात यावा अशी मागणी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शासनाकडे केली आहे. यासोबतच मास्‍क, सॅनिटायझर, पीपीई किट्स, ग्‍लोव्‍हज यावरील राज्‍य वस्‍तु व सेवाकर माफ करण्‍यात यावा अशी मागणी सुध्‍दा त्‍यांनी केली आहे.

चंद्रपूर जिल्‍हयातील शासकीय रूग्‍णालयात कोरोनासाठी केवळ 8 व्‍हेंटीलेटर्स आरक्षीत करण्‍यात आले आहे. सदर रूग्‍णालयात आणखी 12 व्‍हेंटीलेटर्स ची आवश्‍यकता आहे. तसेच पीपीई किटसची सुध्‍दा कमतरता रूग्‍णालयात आहे. त्‍याचप्रमाणे एन-95 मास्‍क चा सुध्‍दा तुटवडा जिल्‍हयात आहे. शासनाने त्‍वरीत चंद्रपूर जिल्‍हयासाठी रूग्‍णालयात 12 व्‍हेंटीलेटर्स, 5 हजार पीपीई किट्स व 10 हजार एन-95 मास्‍क चा पुरवठा करण्‍याची मागणी त्‍यांनी शासनाकडे केली आहे.

*मास्‍क व सॅनिटायझर, पीपीई किट्स, ग्‍लोव्‍हज वरील राज्‍य वस्‍तु व सेवाकर माफ करावा*

राज्‍य सरकारने कोरोना संकटाच्‍या पार्श्‍वभूमीवर अनेक वस्‍तुंवरील वस्‍तु व सेवाकर (GST) माफ करण्‍याबाबत केंद्र सरकारला विनंती केली आहे. मात्र त्‍यासाठी जीएसटी कॉन्‍सीलची बैठक होणे आवश्‍यक आहे, परंतु सद्यःस्थितीत ही बैठक होईपर्यंत राज्‍य सरकार आपला राज्‍य वस्‍तु व सेवाकर माफ करण्‍याचा निर्णय घेवू शकते. त्‍यादृष्‍टीने राज्‍य सरकारने मास्‍क, सॅनिटायझर, पीपीई किट्स, ग्‍लोव्‍हज यावरील राज्‍य वस्‍तु व सेवाकर माफ करण्‍याची आवश्‍यकता लक्षात घेता याबाबत त्‍वरीत निर्णय घेण्‍याची मागणी आ. मुनगंटीवार यांनी शासनाकडे केली आहे.

*ऑटोरिक्षा चालक, असंघटीत कामगार व बांधकाम कामगारांच्‍या खात्‍यात 5 हजार रूपये जमा करावे*

कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव हे आज जागतीक संकट ठरले आहे. भारतात या विषाणुचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्‍तांची संख्‍या महाराष्‍ट्रात आहे. 60 च्‍या वर बळींची संख्‍या गेली आहे. लॉकडाऊनमुळे अनेक प्रश्‍न राज्‍यातील जनतेसमोर प्रामुख्‍याने शेतकरी, कष्‍टकरी, कामगार, उपेक्षित, वंचित, वृध्‍द, निराधार या सटकांसमोर निर्माण झाले आहे. या परिस्‍थीतीत ऑटोरिक्षा चालक, असंघटीत कामगार व बांधकाम कामगारांसमोर कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्‍यामुळे त्‍यांच्‍या खात्‍यात 5 हजार रूपये जमा करण्‍यात यावे अशी मागणी आ. मुनगंटीवार यांनी शासनाकडे केली आहे.