Sardar patel mahavidyalaya: गोंडवाना विद्यापीठस्तरीय "व्यक्तिमत्व विकास" तीन दिवासीय कार्यशाळेचे समारोप

Bhairav Diwase

चंद्रपूर:- सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गोंडवाना विद्यापीठस्तरीय "व्यक्तिमत्व विकास" तीन दिवासीय कार्यशाळा दि. 4 मार्च ते 6 मार्च 2025 पर्यंत आयोजित करण्यात आले. गोंडवाना विद्यापीठस्तरीय "व्यक्तिमत्व विकास" तीन दिवासीय कार्यशाळेचे समारोपीय कार्यक्रम दि 4 मार्च 2025 रोजी आयोजित करण्यात आले.


या कार्यशाळाच्या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद एम. काटकर, मार्गदर्शक शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय हॅण्डबॉल खेळाडू राजेश नायडू, चंद्रपूर वाहतूक शाखाचे पी.एस.आय. रवींद्र चेरपूरवार, चंद्रपूर नेहरू युवा केंद्राचे समन्वयक एडवोकेट देवा पाचभाई, शारीरिक शिक्षण संचालिका डॉ. पुष्पांजली कांबळे, विद्यार्थी विकास विभागाचे प्रमुख डॉ. प्रकाश बोरकर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर. गोंड, डॉ. पुरुषोत्तम माहोरे, डॉ. निखिल देशमुख, डॉ. वंदना खणके, एल. के. एम. आई. एम. एस. आर. कोसराचे डॉ. विवेक कवाडे, तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद एम. काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या कार्यशाळेच्या समारोपय कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद एम. काटकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, व्यक्तिमत्व विकासाचे महत्त्व तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक यशाला आकार देण्यामध्ये त्याची महत्त्वाची भूमिका आहे. ते इतरांशी संवाद साधण्याची, अर्थपूर्ण संबंध निर्माण करण्याची आणि आव्हानांना प्रभावीपणे हाताळण्याची तुमची क्षमता वाढवते.

या कार्यशाळाच्या मार्गदर्शक राजेश नायडू म्हणाले की, व्यक्तिमत्व विकास ही तुमची मानसिकता, वर्तन आणि संवाद सुधारण्याची प्रक्रिया आहे ज्यामुळे तुमचे सर्वोत्तम रूप बाहेर येते. हे केवळ तुमचे बाह्य स्वरूप सुधारण्याबद्दल नाही तर तुमच्या अंतर्गत गुणांना परिष्कृत करण्याबद्दल आहे. ही प्रक्रिया तुम्हाला आत्मविश्वास निर्माण करण्यास, संवाद कौशल्यांना धारदार करण्यास आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यास मदत करते.

तसेच दुसरे मार्गदर्शक पीएसआय रवींद्र चेरपूरवार यांनी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा अभियान या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले कि असुरक्षित ड्रायव्हिंगचा ट्रेंड वाढत आहे ज्यामुळे वाहन अपघात होतात ज्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू होतो, गंभीर दुखापत होते किंवा त्यांचे शरीराचे अवयव कायमचे गमावले जातात. यापैकी बरेच अपघात ड्रायव्हिंगचे कौशल्य कमी असणे, रस्ता सुरक्षा खबरदारीचे पालन न करणे, जागरूकतेचा अभाव आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन यामुळे होतात.

या कार्यक्रमाचे संचालन कार्यक्रम अधिकारी डॉ. पुरुषोत्तम माहोरे यांनी केले. तर आभार रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर. गोंड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील रासेयो स्वयंसेवकांची अथक परिश्रम घेतले.