Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

इरई धरणाचे दोन दार उघडले! #Chandrapur #door

चंद्रपूर प्रशासन 'हाय अर्लट'वर
चंद्रपूर:- इरई धरणातील पाण्याची पातळी सततच्या पावसाने वाढत असल्याने या धरणाचे दोन द्वार 0.25 मिटरने उघडले आहेत. सोमवारी सायंकाळच्या सुमारास उघडावे लागले.
 इरई नदी काठावर राहणार्‍या व परिसरातील वडगाव, हवेली गार्डन, नगिनाबाग, महसुल, सिस्टर कॉलनी, रहेमत नगर तसेच झरपट नदी लगतच्या तुळजा भवानी, महाकाली वॉर्ड, भंगाराम परिसर, सोनारी मोहल्ला, दादमहल, काजीपुरा वसाहत येथील नागरिकांनी नदीपात्रापासून दूर सुरक्षित ठिकाणी रहावे, असे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.
महाऔष्णिीक विज केंद्राला लागून असलेल्या इरई धरणातील पाण्याच्या साठ्यात वाढ झाल्याने इरई नदीकाठावरील पद्मापूर, किटाळी, मसाळा, पडोली, यशवंतनगर, दाताळा, आरवट, नांदगाव (पोडे), भटाळी, वढोळी, चिचोली, कढोली, पायली, विचोडा, खैरगाव, चांदसुर्ला, विचोडा (बुजुर्ग), आंभोरा, लखमापूर, कोसारा, खुटाळा हडस्ती, चारवट, कवठी, चेक तिरवंजा, देवाळा, चोराळा, हिंगनाळा, चिंचोळी, मिनगाव, वडगाव, चंद्रपूर शहर, माना आणि इरई नदीच्या काठावरील गावांना हाय अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे.
नागरिकांना सतर्क करून पूरस्थितीपासून दूर राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे. पूरस्थिती निर्माण झाल्यास इरई धरणाच्या क्षेत्रातील संभाव्य धोका लक्षात घेता प्रतिबंधक उपाय व सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून रस्ते बंद करण्यात आले आहेत ,असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत