वाहतुकीच्या साधनाअभावी नागरिकांची गैरसोय.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Aug 24, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) धनराज कोहळे रैयतवारी (जांब), सावली
सावली:- केंद्र शासनाने तसेच राज्यशासनाने राज्यातील लालपरीला हिरवा कंदील दिला आहे. परंतु सदर लालपरी ही केवळ मुख्य मार्गावरच धावत असल्यामुळे खेड्यापाड्यातील नागरिकांना शासकीय कामे, खाजगी कामे, दवाखाना अशा विविध कामानिमित्त तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. परंतु लालपरी तसेच खाजगी गाड्यासुध्या बंद असल्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी खूप मोठं त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी प्रहार सेवक राकेश गोलेपल्लीवार यांनी ST महामंडळ तसेच चंद्रपुर जिल्हाचे पालकमंत्री साहेब यांना निवेदन देण्याचे ठरविले आहे. निवेदनाद्वारे शासनाला होणाऱ्या त्रासाची माहिती करून देऊन होणाऱ्या हालअपेष्टा बंद कराव्यात व ग्रामीण भागात एस टी सेवा सुरू करण्यात यावी. अशी मागणी प्रहार सेवक राकेश एम गोलेपल्लीवार यांनी केली आहे