दीड महिन्यापासून ट्रांसफार्मर जळाल्यामुळे पाच एकर शेतीच पाण्याविना नुकसान.

Bhairav Diwase
पिक मरतांना पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रु.
Bhairav Diwase.    Oct 09, 2020




(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) धनराज कोहळे रैयतवारी (जांब), सावली
सावली:- सावली तालुक्यातील लोंढोली येथे दीड महिन्याअगोदर ट्रांसफार्मर जळाल्याने पाच एकर शेतीतील पिक मरत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.किशोर गुरुदेव सातपुते यांच्या शेतातील पिक दरवर्षी कमी होत असल्यामुळे शेतात मोटार बसवून विज जोडनी केली.पण म्हणतात ना, ईश्वर पण पहायला लागला की हातातील सरस निघुन जातो.
असाच प्रकार यावर्षी शेतकऱ्यांच्या बाबतीत यावर्षी दिसतो. कोरोनामुळे लॉकडाउन आणि त्यामुळे अनेकांचे मजुरीचे काम बंद, शेती केली तर कधी वेळेवर पाणी नाही, शेतीची रोवनी चांगली असता पुराचा फटका तर पिक गर्भात असतांना पाणी नाही, आणि रोगाचा प्रादुर्भाव अशा अनेक समस्यांना तोंड देत शेतकरी खचून चालला आहे. आता तोंडघाशी आलेला पिक मरतांना पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे.२४ ऑगस्ट ला शेतातील ट्रांसफार्मर जळाले याची माहिती विद्युत विभागाला देण्यात आली. पण एक महीना लोटूनहि ट्रांसफार्मर न लागल्यामुळे हातातील पिक मरतांना पहावे लागत आहे.विजवितरण कर्मचारी यांना फोन केल्यास दिशाभूल करीत दोन दिवस म्हणत, दीड महीना लोटून गेला पण अजूनही ट्रांसफार्मर लावून देण्याचे काम करीत नाही. आणि आता शेतकऱ्यांने फोन केल्यास जेव्हा येईल तेव्हा लावून देऊ ही भाषा वापरित असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
     
   

मी सतत मागील एक महिन्यापासून व्याहाड येथील ऑफिसमध्ये नविन ट्रांसफार्मर लावून देण्याची मागणी केली, पण चार पाच दिवसाकडे ट्रांसफार्मर येईल असे सांगत होते आणि याच आशेवर मला ठेवण्यात आले. आज दीड महीना लोटून गेला त्यामुळे माझी शेती पाण्याविणा मरत आहे. आणि पाचही एकर शेती मरण पावल्यास मी व माझे कुटुंब कसे जगणार, मला नविन ट्रांसफार्मर लावून देण्यात यावा, किंवा २०० मीटर अंतरावर असणाऱ्या डीपी वर कनेक्शन देवून पर्यायी व्यवस्था करून द्यावी. जर शेतीच नाही झाली तर माझे कुटुंब कसे जगणार?
किशोर गुरुदेव सातपुते
शेतकरी



जवळपास व चंद्रपुर येथे १६ चा ट्रांसफार्मर उपलब्ध नाही आहे. त्यामुळे जेव्हा ट्रांसफार्मर येईल तेव्हाच आम्ही ट्रांसफार्मर लावून देणार.
गौरकर उपविभागीय अभियंता
व्याहाड खुर्द, तालुका सावली
  

शेतकऱ्यांनी तोंडी तक्रार दिल्या नंतरही दखल न घेणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी. व झालेल्या पिकांची नुकसान भरपाई देण्यात यावी. या दोन दिवसात ट्रांसफार्मर न लावून दिल्यास विद्युत कार्यालय समोर आंदोलन करण्यात येईल. असा इशारा प्रहार सेवक राकेश गोलेपल्लीवार व प्रफुल तुम्मे यांनी दिला आहे.