(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) किशोर माहोरकर फुटाना, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- सध्या संपूर्ण देशभरात कोरोणाचे सावट पसरलेले आहे. संपूर्ण देशाची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. अशातच संपूर्ण शिक्षण व्यवस्था सुधा मागिल काही महिन्यापासून ठप्प पडलेली आहे. याचा परिणाम शाळकरी मुलांवर होउन त्यांची अभ्यासु वृत्ति कुठे तरी लुप्त होताना दिसत आहे. याच गोष्टिवर लक्ष केंद्रित करत पोंभुर्णा तालुक्यातील भिमनी गावतील अविनाश कोडापे, अविनाश गोन्धली, विशाल नानगिरिवार, सागर कोडापे, यानी निशुल्क शिकवणी वर्ग सुरु केले.
भिमनी येथील या चार युवकानी शाळा बंद, शिक्षण सुरु. हा उपक्रम मागिल एक महिन्यापासुन सुरु केला आहे. हा वर्ग रस्त्यावरच भरविला जात आहे. कोरोना परिस्थितित शासनाने आनलाइन शिक्षण सुरु केले परंतु ग्रामीण भागातील मुलांच्या पालकाची ऐनड्राइड मोबाइल खरेदी करण्याची एपत नसल्यामुड़े कियेक मुले शिक्षनापासून वंचित राहत आहेत. मूल ही शिक्षणापासून दूर राहु नये, त्यांचे नुकसान होऊ नये, या साठी या चार युवकानी पुढाकार घेतला आहे.
शालेय अभ्यास क्रमाबरोबरच , चित्रकला, पत्रलेखन, निबंध लेखन,सामान्य ज्ञान, नृत्य कला, इत्यादि मुड़े विधार्थ्याचे मनात नव चैतन्य निर्माण झाले आहे. विधार्थिचे हित लक्षात घेऊन पालक वर्गानी सुधा साहित्याची मदत केली. युवकाच्या उपक्रमामुड़े पालकानी समाधान व्यक्त केले.