Top News

महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील गोंदापुर गाव मुलभुत सुविधांपासून वंचित. #Gondapur #jivati


स्वातंत्र्याच्या ७५ वर्षा नंतर ही गोंदापूर गाव विकासापासून कोसो दूर? लोकप्रतिनिधींची उदासीनता?
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- अतिदुर्गम आदिवासी मानीकगड पहाडावरील जिवती तालुक्यातील गोंदापूर गावाची हकीकत एकीकडे शासन गाव विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध योजनेच्या माध्यमातून कोट्यावधी निधी खर्च करित आहे तर दुसरीकडे माञ शासन प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे गावात शासकीय योजना पोहोचल्या नाहीत हि शोकांतीका आहे.सद्या चोहीकडे डेंग्यू मलेरियाचे साथीचे प्रमाण जास्त वाढले असल्याचे दिसून येते आहे या प्रसंगी गावातील नागरिकांना नाहक ञास सहन कराव लागत असल्याचा प्रकार बघायला मिळत आहे. #Gondapur #jivati
जिवती तालुक्यातील तेलंगनाच्या पूर्वेकडील शेवटच्या टोकावरील हे गाव "गोंदापूर" ग्रामपंचायत भोक्सापूर अंतर्गत येणाऱ्या या गावची स्थापना 1990 ला झालेली असून आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी शेती हा आपला परंपारिक व्यवसाय करून आपलं जीवन जगण्यासाठी गेल्या 30 वर्षापासून राहतं आहेत. 20 वस्तीच्या या गावाला शासन आज न उद्या येईल व आपल्याकडे लक्ष देईल व आपल्या गरजा व अपेक्षा पूर्ण करेल या आशेचे किरण घेऊन बसलेल्या या गावाकऱ्यांना गेले 30 वर्ष लोटूनही अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या या गावाचां गेल्या 30 वर्षापासून अपेक्षाचा भंग झाला आहे.या गावात पांदण रस्ता सुद्धा नसल्याने.येण्या जाण्याची साधी सोय सुद्धा नाही.मानवाची मूलभूत गरज समजली जाणारी पिण्याच्या पाण्याची साधी सोय, वीज कनेक्शन,सुद्धा आजपर्यंत या गावापर्यंत नाही.उन्हाळ्यात ये-जा करण्यासाठी मोटारसायकल जाण्यायेण्यापूरता रस्ता गावकऱ्यांनी श्रमदान करून बनवलेला रस्ता हा सतत संत्ततधार अतिवृष्टी पावसाने पूर्णपणे वाहून गेल्याने आतातरी या गावाचा पूर्णच संपर्क तुटला असल्याने या गावात येण्याजाण्याची तुटकी फुटकी सोय सुद्धा नसल्याने महिलांची दिलिवरी सुद्धा या गावकऱ्याना आपल्या गावातच करावी लागते याचा नाहक त्रास त्यांना नेहमीचाच सहन करावा लागत आहे.ग्रामपंचायतीने तर या गावाला साधा पादंन रस्ता सुद्धा दिलेला नसल्याने नेहमीचच दुर्लक्ष केलेल्या या गावाला पंचायत समितीने सुद्धा कधी लक्ष दिलेल नाही. तसेच शासनाने सुद्धा या गावाची साधी दखल घेतलेली नाही.
या गावात साधा पांदंन रस्ता नाही, विज कनेक्शन नाही, हातपंप नाही, अंगणवाडी केंद्र नाही,शाळा नाही,या डिजिटल जगातील मोबाईल ला कव्हरेज सुद्धा नाही.या गावाकडे नेहमीच शासनाच दुर्लक्ष केल्याने चित्र दिसत आहे. अशा गावात आम्ही जगायचं तरी कस हा प्रश्न गावावंशीयांनी उपस्थित केला आहे. गावात आजपर्यंत कोणत्याही शाशकीय योजना पोहचलेल्या नाहीत.त्यामुळे मानवाचे जीवन जणू हे जंगली जनावरा सारखे जगावे लागत असल्याचे  गावकरी बोलत आहेत.स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी लक्ष देऊन जिवती तालुक्यातील मौजा गोंदापुर येथील समस्या निकाली काढावे अन्यथा गोंदापूर गाववासीयांना घेऊन शेतकरी संघटना  आंदोलन करणार - सय्यद शब्बीर जागीरदार जिवती तालुकाप्रमुख शेतकरी संघटना यांनी वर्तमानपत्र च्या माध्यमातून इशारा दिला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने