वनविभागाने केली दंडुकशाही सूचना न देता वन पट्टे धारकांची शेती करीत आहे उध्वस्त.

Bhairav Diwase
भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला विरोध.
Bhairav Diwase.    July 09, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या गावातील आदिवासी लोकांनी  आपल्या पुर्वजापासुन (दोन तीन पिढ्यापासुन)जंगलालगत असलेली अतिक्रमीत जमीनीमध्ये उत्पन्न घेवुन आजपर्यंत आपले कुंटुंबाचे उदरनिर्वाह करीत होते शासनाकडुन त्या जमीनीचा पट्टा मिळावा म्हणुन संबधीत कार्यलयात बऱ्याच वर्षापासुन त्यांचा प्रस्ताव देखील प्रलंबीत असुन देखील व शासकीय कार्यालयाकडुन अतिक्रमण धारकांना कोणत्याही प्रकारची सुचना न देता कोलारा,करबडा,विहीरगाव आदी गावातील आदिवासी,गरजु अतिक्रमण धारकाची शेती मध्ये जे सी बी मशीनचा वापर करुन उध्वस्त करुन गरीब शेतकऱ्यावर वनविभागाने अन्याय केल्याचे दिसुन येत असून वन विभाग दंडुकशाही चा वापर करीत असून कोणतीही सूचना न देता शेतजमीन उध्वस्त करीत असल्याने त्याचा निषेध करीत जेसीबी मशीन आणि त्या कारवाई चा विरोध भाजपचे मासळ मदनापूर जीप क्षेत्र प्रमुख प्रवीण गणोरकर पस क्षेत्र प्रमुख गजानन गुळध्ये यांनी केला
            वन जमिनीवर सामूहिक दावे केले असून सदर प्रकरणे प्रलंबित आहे  राज्याच्या महाविकास आघाडी शासनाने कोणताही आदेश काढला नसताना व पूर्व सूचना न देता वन विभाग मात्र त्या संबंधित  शेतकऱ्यांची शेती उध्वस्त करून त्यांचे कुटुंब उघड्यावर पाडण्याचा डाव उधळून लावण्याचा इशारा देत आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या नेतृत्वाखाली सर्व वन अतिक्रमण असलेल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलन उभारून न्याय मिळवून देणार असून वन विभागाने मात्र जेसीबी लावून शेती उध्वस्त करू नये  व अन्याय करू नये प्रवीण गणोरकर व गजानन गुळध्ये यांनी प्रत्यक्ष त्या शेतीवर जाऊन वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी जाऊन कानउघाडणी केली .