चंद्रपूर:- रहमत नगर येथे पाणी साचल्याने खबरदारी म्हणुन परीसरातील २५ घरातील नागरीकांना सुरक्षीत स्थळी हलविण्यात आले आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या महात्मा ज्योतिबा फुले शाळा घुटकाळा व सरदार पटेल कन्या शाळा येथे या नागरीकांना आणण्यात आले असुन इतर नागरीकांनाही आणण्याची मोहीम सुरु आहे.
