Top News

आज चंद्रपूर जिल्ह्यात 1265 नागरिकांनी केली कोरोनावर मात. #corona update

24 तासात 1125 पॉझिटिव्ह तर 24 मृत्यू.

आतापर्यंत 44,088 जणांची कोरोनावर मात; ॲक्टीव पॉझिटिव्ह 16,420.
Bhairav Diwase. May 01, 2021
चंद्रपूर:- जिल्ह्यात मागील 24 तासात 1265 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1125 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 24 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 61 हजार 437 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 44 हजार 88 झाली आहे. सध्या 16 हजार 420 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 81 हजार 53 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 14 हजार 491नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील दुर्गापूर येथील 83 वर्षीय पुरुष, बाबुपेठ येथील 45 वर्षीय महिला, नगीना बाग परिसरातील 49 वर्षीय पुरुष, 56 व 65 वर्षीय महिला, 35 वर्षीय पुरुष, तुकूम येथील 58 वर्षीय पुरुष, सुमित्रा नगर परिसरातील 45 वर्षीय महिला, गजानन महाराज मंदिर चौक परिसरातील 54 वर्षीय पुरुष,38 वर्षीय पुरुष, घुगुस येथील 26 वर्षीय पुरुष, भद्रावती तालुक्यातील सुमठाणा येथील 60 वर्षीय महिला, ब्रह्मपुरी तालुक्यातील 53,65 व 70 वर्षीय महिला,वरोरा तालुक्यातील 53 वर्षीय पुरुष, चिमूर तालुक्यातील पिंपळनेरी येथील 46 वर्षीय पुरुष, भिसी येथील 64 वर्षीय पुरुष, नागभीड तालुक्यातील कन्हाळगाव येथील 65 वर्षीय पुरुष, बल्लारपूर तालुक्यातील 29 वर्षीय महिला, कोरपना तालुक्यातील 44 वर्षीय महिला, गोंडपिपरी तालुक्यातील 33 वर्षीय पुरुष, सिंदेवाही तालुक्यातील 56 वर्षीय पुरुष, तर गडचिरोली जिल्ह्यातील 45 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 929 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 859, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 28, यवतमाळ 27, भंडारा नऊ, गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1125 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 442, चंद्रपूर तालुका 96, बल्लारपूर 86, भद्रावती 12, ब्रम्हपुरी 63, नागभिड 89, सिंदेवाही 03 , मूल 49, सावली 34, पोंभूर्णा 06, गोंडपिपरी 57, राजूरा 40, चिमूर 41, वरोरा 31, कोरपना 30, जिवती 20 व इतर ठिकाणच्या 26 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने