Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

वीज पडून 20 बकऱ्यांचा मृत्यू #chandrapur


राजुरा:- वीज पडून 20 बकऱ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज संध्याकाळी चंद्रपूरमधील राजुरा तालुक्यातील सोंडो गावातील शेतशिवारात घडली. संध्याकाळी अचानक वीज गर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्या पावसात शेतशिवारातील एका झाडा जवळ उभ्या असलेल्या 20 बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. या बकऱ्या वासुदेव जितापेनवार यांच्या असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार घटनास्थळी पोहचले. 20 बकऱ्यांचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत