गडचिरोली:- राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार त्यांच्या सोबत उद्योग मंत्री उदय सामंत आणि पार्थ पवार नागपूर ते गडचिरोली हेलिकॉप्टर प्रवासात सूदैवाने बचावले आहेत.
खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर पावसाळी ढगात भरकटले होते. खराब हवामानामुळे दृष्यमानता अत्यंत कमी झाली होती. हेलिकॉप्टर पायलटने मोठ्या कौशल्याने हेलिकॉप्टर जमीनीवर उतरवले. त्यामुळे पुढील मोठी दूर्घटना टळली.
चार महत्त्वाचे नेते या हेलिकॉप्टरमध्ये होते. त्यावेळी हेलिकॉप्टर भरकटले होते. गडचिरोलीत खराब हवामानाचा फटका त्यांना बसला होता. पण, सुदैवाने सर्वजण सुखरुप आहेत. हेलिकॉप्टर पायलटने यावेळी आपलं कौशल्य दाखवल्याचं सांगितलं जातं. त्याने सुखरूप हेलिकॉप्टर जमिनीवर उतरवलं, असं साम टीव्हीच्या वृत्तात सांगण्यात आलं आहे.