Top News

अतिवृष्टी व महापुरामुळे झालेल्या हानीचे त्वरीत पंचनामे करुन शेतक-यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्या #chandrapur


भाजपा ओबीसी मोर्चा तालुका उपाध्यक्ष महेश कोलावारांची मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

चंद्रपूर:- अतिवृष्टी व महापुरामुळे झालेल्या हानीचे त्वरीत पंचनामे करुन शेतक-यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याची मागणी भाजपा ओबीसी मोर्चा तालुका उपाध्यक्ष महेश कोलावार यांनी केली आहे.याबाबतचे निवेदन राज्याचे मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठविण्यात आले.
सदर निवेदनातून कोलावार म्हणाले की महाराष्ट्र व प्रामुख्याने विदर्भात सर्वञ गत ७ ते ८ दिवसापासून संततधार पाऊस सुरु आहे.या पावसामुळे नद्या,नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला.पुराच्या पाण्यात वाढ होऊन नदीकाठची शेती वाहून गेली.हजारो हेक्टर शेतांमध्ये पाणी साचून राहिल्याने भात,सोयाबीन,कापूस व तुरीचे पीक यांसारख्या उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले.शेतक-यांसमोर अतिवृष्टीचे हे नवे अस्मानी संकट निर्माण होऊन शेतकरी हतबल झाला आहे.जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला पुन्हा खंबीरपणे उभे रहायला प्रशासनांनी मदतीचे हात उचलण्याची वेळ आली आहे.
तरी प्रशासनानी अतिवृष्टी व महापुरामुळे झालेल्या हानीचे त्वरीत पंचनामे करुन
शेतक-यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी महेश कोलावार यांनी यावेळी केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने