श्रिकांत साव; पुस्तकांसाठी घर बांधणारा अवलिया.

Bhairav Diwase
खरच होता येईल आपल्याला इतकं श्रीमंत?

चंद्रपुरात दिसतंय पुस्तकाचं घर.      

समाज सेवक अविनाश पौइणकर यांनी घेतली श्रीकांत साव यांची भेट अविनाश पौइणकर यांच्या शब्दात.
Bhairav  Diwase.    Sep 18, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- श्रिकांत साव हे नाव चंद्रपुरच्या बेरोजगार चळवळीतील अग्रणी. मोर्चे आणि आंदोलनातील ठळक चेहरा. महाविद्यालयीन जीवनात वक्तृत्व, वादविवाद स्पर्धा गाजवल्या. त्यातून मिळणा-या पैशातून पुस्तके घ्यायला सुरुवात केली. घरची परिस्थिती बेताचीच. तरिही शिक्षणात अव्वल. चंद्रपूरात कृती अकाडमी च्या माध्यमाने स्पर्धा परिक्षा क्लासेसद्वारे शेकडो मुलांचे शासकीय नौकरीचे स्वप्न साकार करण्यात यांचाच तसा खारीचा वाटा. ग्रामीण भागातील अनेक मुलांना त्यांनी सामाजिक दायित्व म्हणून मोफत शिकवलं. श्रिकांत  सध्या बेरोगारींच्या प्रश्नावर पिएचडी करतोय. संवेदनशील मनाच्या या साव चा पुस्तक साठा बघितला की या कलंदराची उंची तितकीच खोली कळते. 


समाजसेवक अविनाश पौईनकर यांनी  खुटाळा या गावी श्रिकांतच्या घरी भेट दिली. नुकतेच अतिशय परिश्रमाने आणि स्वमेहनतीने त्यांनी घर बांधले. घर कसले, ग्रंथालयच !  जवळपास १०००० पुस्तकांचा विविध विषयांवर ग्रंथसाठा त्यांच्याकडे आहे. खरंतर हे घर मी पुस्तकासाठीच बांधलंय असं श्रिकांत बोलला. अख्ख भारावलेपण होतं. अनेकांकडे पुस्तकांची मागणी करुन त्यांनी इतकी पुस्तके जमवली. प्रसिद्ध व्यंगचित्रकार मनोहर सप्रे, लोकमतचे मा.संपादक सुरेश द्वादशीवार, स्व.प्रा.जया द्वादशीवार, साहित्यिक व संपादक मदन धनकर, डॉ.पद्मरेखा धनकर, डॉ.जयश्री कापसे-गावंडे यांनी श्रिकांत ला मदत केली. श्रिकांत च्या ग्रंथालयात जागतिक इंग्रजी साहित्य, दुर्मीळ संदर्भ ग्रंथ, स्पर्धा परिक्षेच्या पुस्तकासह कथा, कविता, कादंबरी, चरित्रांची हजारो महत्त्वाची पुस्तकं आहेत. त्यांनी त्यांचं घरचं पुस्तक वाचणा-यांसाठी व अभ्यास करणा-या युवकांसाठी मोकळं केलं...

'पुस्तकाचं गाव' नावाची चळवळ श्रिकांत चंद्रपुरात चालवतो. या अंतर्गत वाचकांना हवी ती पुस्तके मिळवून देवून वाचन संस्कृतीच तो जोपासतोय. स्वत:च्या आयुष्यात खस्ता खावून पुस्तकांसाठी जीव लावणा-या, पुस्तकांसाठी घर बांधणा-या या वेड्या पुस्तक प्रेमींसाठी  आणखी काय लिहावे ?

पुस्तकांसाठी कोणी इतकं धडपडतोय? घर बांधतोय, यावर हल्ली कोणी विश्र्वासच ठेवणार नाही...

समाजाने अशा कोहीनुराच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याची गरज आहे....
असे मत अविनाश पौईनकर यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मांडली