Top News

भुस्खलन झाल्याने घर ६० ते ८० फुट गेले खड्ड्यात


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात 
चंद्रपूर:- घुग्घूस शहरातील आमराई वार्डात एक उभे घर थेट फूट खाली जमिनीत गडप झाले. या गावात सर्वत्र असलेल्या भूमिगत कोळसा खाणीमुळे हा प्रकार झाल्याची चर्चा आहे . 
 गजानन मडावी यांचे राहते घर अचानक हलू लागल्याने घाबरुन जात घरातील सदस्य बाहेर पडले. काही क्षणातच अख्खे घर ६० ते ८० फूट जमिनीत गडप झाल्याने आसपासच्या नागरिकांमध्ये दहशत पसरली.
 
 सरकारी कोळसा कंपनी वेस्टर्न कोल फील्ड्स लिमिटेडच्या खाणीमुळे या परिसरात अनेकदा घरे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र अशा पद्धतीने एकच घर ६० ते ८० फूट गडप होण्याची ही धक्कादायक घटना प्रथमच उजेडात आली आहे. घटनास्थळी महसूल खाण प्रशासन व पोलिसांचे पथक दाखल झाले आहे. सध्या परिसरातील वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने