Top News

चंद्रपुर आणि गडचिरोली सिमा लगत वैनगंगा नदीला असलेले चिचडोह बॅरेजचे पाणी १ जूनला सोडण्यात येणार.

नागरिकांनी व गावकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन. 
Bhairav Diwase.   May 31, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- चंद्रपुर आणि गडचिरोली सिमा लगत वैनगंगा नदीला असलेले चिचडोह बॅरेजचे पाणी १ जूनला सोडण्यात येणार आहे. यावर्षी पावसाळा १ जून पासून सुरू होत आहे. चंद्रपूर बॅरेज मध्ये साठविलेला पाणीसाठा कमी करून सर्व ३८ दरवाजे १ जून २०२० ला उघडण्याचे नियोजित आहे. त्यामुळे नदीतील निम्न भागातील पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. वाढीव पाणी पातळीमुळे जीवित व वित्त हानी होऊ नये, म्हणून सर्व लगतच्या गावांना व ग्रामपंचायतींनी सतर्क राहावे. नदीकाठावर जाणे टाळावे तसेच नदीकाठावरील शेतामध्ये कामे करताना सतर्कता बाळगावी. नदीवर आंघोळ करतांना, मासेमारी करणारे, नदी घाटातून रेती काढणारे, पशुपालक, नदीतून ये-जा करणारे, बॅरेज परिसरातील गावकऱ्यांनी व नदीकाठच्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी व सतर्क रहावे, असे आवाहन लघु पाटबंधारे विभागामार्फत करण्यात आलेले आहे.    शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाकांक्षी असलेला चिचडोह बॅरेज प्रकल्प गडचिरोली-चंद्रपुर जिल्ह्यातील सिमालगत  वैनगंगा नदीवर उभारण्यात आला आहे. हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेला आहे. या प्रकल्पामुळे पिण्याच्या पाण्याचाच नव्हे तर शेतीच्या सिंचनाचाही प्रश्‍न सुटला आहे. पावसाळयापूर्वी प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडण्याबाबत प्रपत्र सादर करून सांगण्यात आले आहे. ३८ या कार्यालयांतर्गत, वैनगंगा नदीवर , गडचिरोली जिल्हयातील चामोर्शी तालुका मुख्यालयापासून उत्तरेस ५ कि.मी. अंतरावर चिचडोह बॅरेजचे बांधकाम पूर्ण झाले आहे . सदर बॅरेज मार्कंडा देवस्थानापासून वैनगंगा नदिचे वरचे बाजुस ४.०० कि . मी . वर आहे. सदर बॅरेजची एकुण लांबी ६ ९ १ मीटर असून १५ मी . लांब x १ मीटर उंचीचे ३८ लोखंडी दरवाजे बसविण्यात आलेले आहेत.दि.८ नोव्हेंबर २०१९ पासून सदर दरवाजे बंद करण्यात आले होते. यावर्षी पावसाळा १ जुन पासुन सुरू होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने