सावली तालुक्यातील दुसटी घटना.
Bhairav Diwase. Sep 02, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- करंट लागून सकाळी एका शेतकऱ्याचा मृत्यूची बातमी सकाळी येताच खळबळ झाली असतांनाच पुन्हा दुपारी एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटनेने खळबळ उडाली आहे.एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांचा मृत्यु ने सावली तालुका हादरला आहे . वैनगंगा नदीच्या पात्रामध्ये गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी टाकल्याने सावली तालुक्यात नदी काठावरील सर्वत्र हाहाकार माजला आहे . सावली तालुक्यातील अनेक शेती पाण्याखाली आहे . आज थोडा पूर ओसरला म्हणून सामदा येथील प्रगतशील शेतकरी रुपेश बुरले वय 38 वर्ष हे शेतात गेले . याचा संपूर्ण शेत पाण्यात होता तसेच मोटार पंप सुध्दा बुडून होता . पाळीवर असलेले छोटे झाड तोडले.व त्या झाडावरील मोटार पंप च्या वायर ला उचलून बाजूला ठेवतो म्हणून हात लावताच त्यांना जोरदार करंट लागला व ते जागीच ठार झाले . ही घटना आज सकाळी 8 च्या दरम्यान घडली . त्यानंतर आज दुपारच्या सुमारास सावली तालुक्यातील लोंढोली येथील युवा शेतकरी रविंद सुखीराम बोदलकर वय 42 वर्ष हा शेतकरी स्वतःचा शेतात गेला असता त्याचे शरीर अर्ध भाजलेले स्वरूपात शेतात आढळल्याने खळबळ माजली आहे . माहिती घेतली असता शेतात उभा असलेला विजेचा खांब हा पावसामुळे बांधीत पडला.शेतात गेलेल्या शेतकऱ्याला हे माहीती नव्हते.आणि तो शेतात जाताच त्याला जोरदार विजेचा धक्का लागला त्यात तो अर्ध भाजला गेला त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली . घटनेची माहिती पोचताच शेकडो लोक घटनास्थळी पोहचले व त्याला लोंढोली येथील रुग्णालयात आणण्यात आले होते.या घटनेची माहिती सावली पोलिसांना देण्यात आलेली आहे. पुढील तपास सांगली पोलीस करीत आहेत.