चंद्रपूर जिल्ह्यात 3 तारखेपासून सुरू होणारा लॉक डाऊन टळणार?

Bhairav Diwase
केंद्र सरकारने अजुनही लॉक डाऊन साठी परवानगी दिली नाही:- सूत्रांची माहिती
Bhairav Diwase.    Sep 02, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार ह्यांनी जाहिर केलेला चंद्रपूर जिल्ह्यातील लॉक डाऊन उद्या दिनांक 3 सप्टेंबर पासुन सुरु होण्याची चिन्हे नाहीत असे विश्वसनीय सूत्रांकडून कळले आहे.

पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी कडक लॉक डाऊनची घोषणा केली होती. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने ह्यांनीही काल लॉक डाऊन ची रूपरेखा जाहिर करून लॉक डाऊन सुरू करण्यासाठी केंद्र सरकारला परवानगी मागितली असल्याचे सांगितले होते.

विश्वसनीय सूत्रांच्या माहिती वरून असे कळले आहे एकी केंद्र सरकारने अजुनही चंद्रपूर जिल्ह्यात लॉक डाऊन सुरू करण्यासंबंधी कुठलीही परवानगी आतापर्यंत दिली नसून जर परवानगी देण्यात आली नाही किंवा नाकारण्यात आली तर जिल्हा लॉक डाऊन होणार नाही हे निश्चित.

असेही चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर, माजी अर्थमंत्री आम. सुधीर मुनगंटीवार ह्यांनी देखिल लॉक डाऊनला विरोध केलेला असुन आम. सुधीर मुनगंटीवार ह्यांनी JEE, NEET, आणि NATA सारख्या इतर परीक्षा होईपर्यंत लॉक डाऊन करण्यात येऊ नये अशी मागणी थेट राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली होती