चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी व तळोधी (बा.) या स्थापीत अप्पर तहसीलदार कार्यालयातील रिक्त पदे त्वरित भरा:- आ.बंटीभाऊ भांगडीया

Bhairav Diwase

महाराष्ट्र राज्य मंत्रालयाचे मुख्य सचिव यांचेकडे केली मागणी.

Bhairav Diwase.    Sep 01, 2020

(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर

चिमूर:- चिमूर विधानसभा क्षेत्रातील चिमूर तालुक्यातील भिसी व नागभीड तालुक्यातील तळोधी(बाळापूर) येथे दिनांक १०/०८/२०१७ रोजीच्या महसूल व वन विभाग महाराष्ट्र राज्य शासन निर्णय क्रमांक प्राफेब २०१५/प्र. क्र.७१/म.१०मंत्रालय मुंबई -३२ अन्वये स्वतंत्र अप्पर तहसीलदार कार्यालये मंजूर करण्यात आले असून सदर कार्यालये स्वतंत्रपणे कार्यान्वीत असतांना पद संख्या न भरल्यामुळे अडचणी समस्या निर्माण होत आहेत.

     चिमूर तालुक्यामध्ये सध्यास्थीतीत ९१ मोठ्या ग्रामपंचायती असून तालुक्यातील भिसी ही सर्वात मोठी कडधान्य बाजारपेठ आहे  व चिमूर शहराच्या शेजारी २० ते२२हजार लोकसंख्येमुळे परिसराच्या प्रशासकीय सोयीसाठी नायब तहसीलदार पदाचे कार्यालय सुरू होण्याच्या मागणीवर झालेल्या मोठया आंदोलनाची  पार्श्वभूमी असल्यामुळे शासनाने प्रशासकीय संपूर्ण कार्यास भिसी येथे अप्पर तहसीलदार कार्यालय स्थापीत केले परंतु अत्यल्प अधिकारी कर्मचारी वर्गामुळे शासनाचे उदिष्ट सफल होतांना दिसत नसतांनाच मागील २ महिण्यापासून अप्पर तहसीलदार अन्यत्र नियुक्तीमुळे  व अन्य कर्मचारी  रिक्त असल्याने कार्यालय सुरू असूनही कामकाज नाममात्र आहे.त्यामुळे नागरिकांना तालुक्या मुख्यालयी प्रवास केल्याशिवाय पर्याय नाही.

      नागभीड तालुक्यातील तळोधी(बाळापूर) हे परिसरातील  सर्वात मोठी शेतकरी बाजारपेठ तालुक्यापासून अंतराने लांब व साधारण १७ते२० हजार लोकसंख्येच्या ठिकाणी भौगोलिक दृष्ट्या नायब तहसीलदार कार्यालय स्थापीत होण्यास योग्य असल्याने शासनाने स्वतंत्र तळोधी येथे अप्पर तहसीलदार कार्यालय निर्माण केले परंतु अद्यापही आवश्यक कामे पूर्णपणे होत नाहीत.तसेच  अत्यल्प अधिकारी व कर्मचारी वर्गामुळे शासनाचे उद्दिष्ट सफल होत  नसतांनाच मागील६ महिन्यापासून  अप्पर तहसीलदार व अन्य कर्मचारी रिक्त असल्याने  कार्यलय नाममात्र झाले आहे.

  कोविड १९परिस्थितीत भिसी व तळोधी येथील स्थापीत कार्यालयात अधिकारी कर्मचारी यांची रिक्त पदे  व आवश्यक सोई सुविधांच्या  अभावी तालुका मुख्यालयी
पायपीट होण्यामुळे नागरिकांत राज्य शासन व जिल्हा प्रशासनावर प्रचंड नाराजी व असंतोषाची भावना निर्माण झाली असून उद्रेकाची स्थिती आहे  त्यामुळे भिसी व तळोधी येथील अप्पर तहसीलदार कार्यालयातील  रिक्त पदे तात्काळ भरावी अशी मागणी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार(बंटी) भांगडीया यांनी मंत्रालयाचे मुख्य सचिव यांचेकडे केली आहे त्याच प्रमाणे विभागीय आयुक्त नागपूर,व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनासुद्धा निवेदन दिले आहे.