Bhairav Diwase. Sep 01, 2020
पोंभुर्णा:- गोसेखुर्द धरणातुन पाण्याच्या सतत विसर्गामुळे वैनगंगा नदीस आलेल्या महापुराने जनजिवन विस्कळीत झाले आहे. पोंभुर्णा तालुक्यातील गंगापुर टोक हे गाव संपुर्ण पाण्याने वेढले आहे. संपुर्ण गावकरी यांनी कालची रात्र जागुन काढली. या गंभीर घटनेची माहीती मिळताच या भागाचे जि.प.सदस्य तथा भाजपा चे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी संबधित विभागास फोन करुन आज सकाळीच लाईफ बोटीची व्यवस्था केली.
सकाळी 10 वाजेपासुन गंगापुर टोक येथील लोकांना लाईफ बोटीद्वारे बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.सांयकाळी 4 वाजेपर्यंत अदांजे 150 ते 200 लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. या लोकांची राहण्याची व्यवस्था कवठी येथील जि.प.शाळेत करण्यात आली आहे. देवराव भोंगळे स्वतः लाईफ बोटीने गंगापुर टोक येथे जाऊन तेथील लोकांना धीर दिला.सोबत प.स.सभापती अल्का आत्राम ,ऊपसभापती ज्योती बुरांडे ,प.स.सदस्य विनोद देशमुख ,गंगाधर मडावी हे होते. काल पासुनच पुराचे पाणी वाढातच होते.त्यामुळे संपुर्ण परिस्थितीवर भाजपा तालुका अध्यक्ष गजानन गोरंटिवार , तहसिलदार निलेश खटके ,नायब तहसिलदार जोगदंड ,ठाणेदार हे नाईकवाड , सरपंच सुनंदा पिपंळशेन्डे ,पोलीस पाटील अल्का मडावी हे संपुर्ण परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.गेल्या 20 वर्षापासून असा पुर आला नाहि असे जाणकार सांगत आहेत.या पुरामुळे शेतकऱ्यांचे धान ,कापुस ,सोयाबीन आणि भाजीपाला प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.