(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- बंजारा समाजातील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या नागपूर येथील वसंतराव नाईक सभागृहाच्या रद्द केलेल्या प्रस्तावावर पुर्णविचार करुन भटक्या विमुक्त समाजावरील अन्याय दुर करण्यात यावा यासाठी बंजारा विकास फाऊंडेशन च्या वतीने जिवती तालुका तहसीलदार साहेबामार्फत निवेदन पत्र देण्यात आले या वेळी बंजारा विकास फाऊंडेशन चे अध्यक्ष श्री अरविंद चव्हाण व उपाध्यक्ष श्री प्रल्हाद चव्हाण कैलाश पवार श्रावण चव्हाण उषाताई पवार यांनी प्रस्तावावर पुर्णविचार करावा आणि रद्द केलेल्या प्रस्तावाला पुनजिवित करुण सभागृहाच्या निर्मितीला त्वरीत सुरुवात करावी यासाठी मुख्य मंत्री यांना निवेदन पत्र देण्यात आला.