24 तासात 297 पॉझिटिव्ह; दोन मृत्यू.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- जिल्ह्यात मागील 24 तासात 179 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 297 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 28 हजार 407 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 25 हजार 569 झाली आहे. सध्या 2407 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 78 हजार 323 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 45 हजार 965 नमुने निगेटीव्ह आले आहेत. 

    आज मृत झालेल्यामध्ये पळसगाव माजरी येथील 85 वर्षीय पुरूष व खारखाडा ब्रम्हपुरी येथील 45वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 431 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 391, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 20, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 297 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 113, चंद्रपूर तालुका 23,  बल्लारपूर 5, भद्रावती 40, ब्रम्हपुरी 11, नागभीड 2, सिंदेवाही 5, मूल 4, सावली 1, पोंभूर्णा 3, गोंडपिपरी 2, राजूरा 2, चिमूर 21, वरोरा 47, कोरपना 12, जीवती 1 व इतर ठिकाणच्या 5 रुग्णांचा समावेश आहे.

कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे