(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चिमूर:- चिमूर तालुक्यातील तुकुम येथील शेतकरी जनार्धन जाभूळे यांचे शेतातील चणा 8 पोते, गहू 7 पोते, तर अंदाजित चार हजार रुपयांची तनीस आगीत जळून खाक झाली. त्यामुुळे अंदाजे एकूण साठ हजार रुपयांची नुकसान झाली.
सदर घटना शुक्रवारी दि 2 एप्रिल दुपारी 2 वाजता सुमारास झाली, असून पंचनामा करण्यात आला. सरपंच बबन गायकवाड, सदस्य भूषण डाहुले, पोलीस पाटील संजय शेडामे, विजय ननावरे तटामुक्ती अध्यक्ष विनायक गजभे उपस्थित होते.