Top News

लग्नानंतर नवरदेवाचा मृत्यू.

संसार थाटण्यापूर्वीच झाला नववधूच्या सप्नांचा चुराडा.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
ब्रम्हपुरी:- लग्न म्हणजे सात जन्माची गाठ. या बंधनात सामाजिक चालीरीती नुसार माणूस विवाह बंधनात बांधल्या जाऊन संसार रुपी गाडा चालवतो. कधीकधी निसर्गनियमानुसार पती-पत्नी दोघेही एकमेकांना अखेरच्या श्वासापर्यंत साथ देतात. तर कोणी मधेच साथ सोडतात. अशीच एक अत्यंत दुःखद घटना आवळगाव जनतेनी कधी डोळ्याने पाहिली नसेल ती काल पहावयास, ऐकावयास मिळाली. मन सुन्न करणारी घटना घडली.


सिदेंवाही तालुक्यातील गडबोरी वासेरा येथील वर श्री नाजूक अभिमन्यू पोहनकर हे आवळगाव ला मोठ्या हौसेने वर बनून आले. कु. दिपाली दिलीप मेश्राम हिच्याशी शासकीय नियमाला अनुसरून कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत आनंदात लग्न सोहळा सकाळी ठीक साडेअकरा वाजताच्या सुमारास पार पडला. लग्न सोहळा पार पडल्यानंतर दुपारी ठीक तीन वाजता च्या दरम्यान रितीरिवाजानुसार वर आपल्या वधूला स्व-गावी नेण्यासाठी वधू सह मोटारीत बसला असता अचानक त्यांची प्रकृती बिघडली.

त्यांना उपचारासाठी ब्रम्हपुरी ला नेले. परंतु तेथील डॉक्टरने त्यांना आरमोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात साठी सांगितले. ब्रम्हपुरी वरून आरमोरी ला नेत असता रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दिपालीने संसाराचे जे स्वप्न पाहिले त्या स्वप्नाचा चकनाचूर झाला. दिपाली च्या अंगाची हळद ओलीची ओलीच राहिली. आणि तिच्या पतीने जिवनभराची साथ सोडली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने