१८ ते ४४ वयोगटातील युवकांना लस बंद हा निर्णय मागे घेण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन.

Bhairav Diwase
भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष राकेश पुन यांच्या वाढदिवसानिमित्त गोंडपिपरी, बल्लारपूर येथे निवेदन सादर.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- आज दि. 17 मे 2021 रोज सोमवारला भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष राकेश पुन यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा चंद्रपूर ग्रामीण यांनी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर (ग्रामीण) देवराव भोंगळे व भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तहसीलदार मार्फत निवेदन देऊन 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण पुन्हा सुरू करण्यात यावे. अशी मागणी केली. आधी दुसरा डोस ची कालावधी 28 दिवस ते 45 दिवस होती. पण नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार ही आता 90 दिवसावर करण्यात आलेली आहे.

सध्या जगभरात तसेच राज्यात कोविड १९ चे रुग्ण संख्याच्या प्रमाणानुसार १८ ते ४४ वर्षे वयातील युवकाना कोरोनाची लागण चे प्रमाण चंद्रपूर जिल्हा तसेच तालुक्यामध्ये जास्त आहे व या वयातील नागरिक सुपर स्पेडटर म्हणून पण आहे. तरी शासनाने १८ ते ४४ वपातील नागरिकांना सध्या लस उपलब्ध करून देण्यात आलेली होती पण ते आता पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. त्याकरिता प्रत्येक जिल्ह्यातील माहिती कार्यालयाला सूचना करून योग्य ते प्रकाशन करून लोकांमध्ये जनजागृती करण्यात यावी. तसेच १८ ते ४४ वयातील नागरीकांना लस उपलब्ध करून देण्याचे करावे अशी मागणी युवा मोर्चा तर्फे करण्यात आली.
त्याप्रसंगी गोंडपिपरी येथे निवेदन देताना बबन निकोडे तालुकाध्यक्ष, निलेश संगमवार भाजपा नेते, चेतन गौर शहराध्यक्ष, सुनील फुकट शहर महामंत्री, निलेश पुलगमकर विपुल, अमित उइके, प्रज्वल बोबाटे, पंकज चिकलकर तसेच बल्लारपूर येथे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मिथिलेश पांडे, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख आदित्य शिंगाळे, पियुष मेश्राम, विद्यार्थी आघाडी जिल्हा महामंत्री प्रतीक बारसागळे आदी उपस्थित होते.