Top News

अजगराच्या अंड्यातून कृत्रिम पद्धतीने चार पिल्लांना जन्म. #Snake #snakenews




(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
मूल:- कृत्रीमरित्या अजगराच्या चार पिल्ल्यांचा जन्म झाल्याची घटना मूल वनपरिक्षेत्रात पहिल्यांदाच घडली आहे. पृथ्वीतलावर पाउल ठेवणाऱ्या चा चार निरागस पिल्लांना प्रादेशिक वनविभागाच्या कक्ष क्रमांक 522 मधील एका नाल्याच्या शेजारी सुरूक्षिरित्या ठेवण्यात आले आहे. वनविभाग आणि संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य या पिलांवर लक्ष ठेवून आहेत. #Snake #snakenews


मूल मध्ये एका शेतशिवारात एका अजगराने पंधरा ते सोळा अंडे दिले होते. कृत्रीम रित्या जन्म झालेल्या या अजगरांच्या पिल्लांबाबत वनविभाग आणि संजीवन संस्थेच्या कार्यकत्या मध्ये आनंदाचे वातावरण आहे. याबाबत त्यांनी मोठी काळजी घेतली होती. चंद्रपूर वनविभाग चंद्रपूर अंतर्गत येत असलेल्या वन​परिक्षेत्र चिचपल्ली उपक्षेत्र मुल मधील मौजा अंतरगाव-पारडवाही येथील वासुदेव गजानन चौखुंडे यांच्या शेतशिवारात एक अजगर साप आपल्या अंडया सोबत असल्याची माहिती संजीवन पर्यावरण संस्थेचे उमेशसिंह झिरे व सदस्यांना दिनांक 30 मे 2021 ला देण्यात आली होती. सदर माहीती क्षेत्र सहायक पी.डी.खनके व वनरक्षक सुभाष मरस्कोल्हे यांना देण्यात आली. लगेच वनकर्मचारी व संजीवन पर्यावरण संस्थेची चमु चौखुंडे यांच्या शेतशीवरात जाऊन पहाणी केली असता शेताताील पाळीजवळच्या खडयात एक अजगर व त्याचे अंडे असल्याचे निर्देशनात आले. वनकर्मचारी व संजीवन संस्थेच्या सदस्यांनी शेतमालक चौखुंडे यांना त्या अजगराला अंडयातून पिल्ले निघेपर्यत तिथेच राहू देण्याची विनंती केली. पण भीतीपोटी शेतमालकाने अजगराला शेतात राहू देण्यास असमर्थता दर्शवली. अजगराला शेतातून पकडून नेण्याची विनंती केली.
सदर घटनेची माहीती चंद्रपूर वनविभागाच्या विभागीय वनाधिकारी सारीका जगताप, सहायकवनसरंक्षक श्रीनिवास लखमावाड व चिचपल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव राजुरकर यांनी देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनात त्या अजगराला क्षेत्र सहायक पी.डी.खनके,वनरक्षक सुभाष मरसस्कोले यांच्या उपस्थितीत संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य प्रशांत मृत्यारपवार,तन्मयसिंह झिरे,मनोज रणदिवे,स्वप्नील आक्केवार, प्रशांत केदार,अंकुश वानी,दिनेश खेवले यांनी अजगराला सुरक्षीतपणे पकडले व अजगराचे अंडे ताब्यात घेतले.
सदर अजगराला वनकर्मचारी व संजीवन पर्यावरण संस्थेच्या सदस्यांच्या उपस्थितीत सुरक्षीतपणे कक्ष क्रमांक 751 मध्ये निसर्गमुक्त करण्यात आले. अजगराच्या अंडयाला वनधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनत वनकर्मचारी व संजीवन पर्यावरण संस्थेच्या देखरेखी खाली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
जवळपास दीड महीना या अंडयाची योग्य काळजी घेतल्यानंतर 15 ते 16 अंडयातून दिनांक 20 जूर्ले 2021 ला चार अजगराची पिल्ले अंडयातून निघाली. या घटनेमुळे वनकर्मचारी आणि संजीवनी संस्थेच्या सदस्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.कृत्रीमरीत्या अजगराचे अंडे उबवुन पील्ले निघन्याची ही मुल तालुक्यातील पहीलीच घटना आहे. अजगराच्या चारही पील्लांना एफडीसीएम च्या कक्ष क्रमांक 522 येथील नाल्या शेजारी सुरक्षीतपणे सोडन्यात आले. यावेळी वनरक्षक सुभाष मरसकोल्हे संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य उमेशसिंह झिरे,स्वप्निल आक्केवार, तन्मयसिंह झिरे,अंकुश वाणी,दिनेश खेवले,चेतन बोकडे, जय मोहुर्ले,रितेश पीजदुरकर,हर्षल वाकडे,अनुराग मोहुर्ले, रुपेश खोब्रागडे, अक्षय दुम्मावार उपस्थीत होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने