Top News

शेतकऱ्यांनो सावधान.....! वाघ येतोय बांधावर #chandrapur #Korpana


शेतात जाऊन काम करणे झाले अवघड

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- कोरपना आदिवासी बहुल तालुक्यातील बहुतांश गावातील सध्या कापूस वेचणी व गहू, हरबरा पेरणीचे कामे शेतशिवारात सुरू आहे. त्यामुळे जास्तीतजास्त महिलावर्ग आपल्या शेतात जात आहेत. पण आता शेतकऱ्यांच्या बांधावर वाघ विरूर पैनगंगा वेकोली परिसरात आल्याची खमंग चर्चेत असतांना पुन्हा आवारपूरच्या अल्ट्राटेक सिमेंट वसाहतीत वाघ आल्याने शेतकऱ्यांनी शेतातील काम करतांना सावध रहाण्याची गरज निर्माण झाली आहे.
दरम्यान येथील वनविभागाने आणि ग्रामपंचायतीने गावपातळीवर दवंडी देण्यासाठी पुढाकार घ्यावा. मात्र, आता या वाघाच्या दहशतीमुळे शेतात जायचे कसे, हा प्रश्न निर्माण होत आहे. त्याचबरोबर शेतकरी कुटूंबाचा उदहनिँवाह म्हणून बकऱ्या, गाय, म्हशी आणि बैल पाळत असतात. त्यांना चराईसाठी शेतशिवारात जावे लागते. आपला जीव मुठीत घेऊन पाळीव प्राण्यांना चराईसाठी शेतकऱ्यांना शेतशिवारात न्यावे लागत आहे.
आज घडीला कोरपना तालुक्यातील विरूर गाडेगाव आणी आवारपूरच्या परिसरात वाघाची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे एकदा ग्रामस्थ कधी घरी परत येतो, यांच्याकडे कुटुंबीय डोळे लाऊन वाट बघत असल्याचे चित्र आता गावागावांत निर्माण झाले आहे. करीता वनविभागाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे . पण तसे होतांना दिसत नाही. तरी शेतकऱ्यांनीही आपल्या शेतात जातांना आता सावधगिरी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. वनविभाग यात अपेक्षितच अपयशी ठरले आहे. असा आरोप महिला आघाडीच्या अध्यक्षा शिला धोटेनी केला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने