Maha vikas aghadi: विदर्भातील 12 जागांवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद?

Bhairav Diwase
1 minute read
नागपूर:- नागपूर जिल्ह्यातील काही जागांसह विदर्भातील काही जागांवरून काँग्रेस व शिवसेना (ठाकरे) या दोन पक्षात पेच निर्माण झाला आहे.

विदर्भातील 12 जागेवरून पेच निर्माण झाला आहे यात आरमोरी, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चिमूर, बल्लारपूर, चंद्रपूर, भद्रावती, रामटेक, कामठी, द. नागपूर, अहेरी, जागांवरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. या मुद्यावरून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते. त्यामुळे महाविकास आघाडीत काही आलबेल नाही, असे चित्र यातून पुढे आले आहे.

दरम्यान काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी शनिवारी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या बैठकीला संजय राऊत उपस्थित होते. त्यानंतर शनिवारी पुन्हा एकदा महाविकास आघाडीची बैठक झाली. उशिरा रात्रीपर्यंत चाललेल्या या बैठकीत जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय होऊ शकला नाही.