Top News

तीन महिन्याचे विद्युत बिल माफ करा.- राकेश पून भाजपा युवा मोर्चा जिल्हा सचिव

तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन.
Bhairav Diwase.   April 22, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी: देशात कोरोना ने थैमान घातले आहे.यात महाराष्ट्र राज्यात रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.खबरदारीचा उपाय म्हणून सरकार कडून 3 मे पर्यंत लॉक डाऊन वाढविण्यात आले आहे.लोक घरात राहून या महामारी विरूद्ध संघर्ष  करीत आहेत.अश्या स्थितीत मजूर,
शेतकरी आणि लहानसहान व्यापारी यांची पंचाईत झाली असून लॉक डाऊन काळात या वर्गाला  कोणतेच काम नाही.त्यामुळे तीन महिने विद्युत बिलाचा भरणा माफ करण्यात यावा अशी मागणी  भाजपा युवा मोर्चा जिल्हा सचिव तथा नगरसेवक राकेश पून यांनी मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वड्डेट्टीवार यांना तहसीलदार मार्फत निवेदन देऊन केली आहे.
        देशात लॉक डाऊन मूळे शहरी भागासह ग्रामीण भागातील लोकांना सुदधा फार मोठा आर्थिक फटका बसला असून सामान्य वर्ग अनेक अडचणीचा सामना करीत आहे. अश्या स्थितीत सामान्य वर्गाची आर्थिक परिस्थिती ढासळली असून देशात सर्वत्र व्यवहार ठप्प पडल्याने व कुठलाच रोजगार उपलब्ध नसल्याने तीन महिन्याचे वीज बिल माफ करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.यावेळी , भाजपा नेते निलेश संगमवार,चेतन गौर,गणेश डहाळे,सुनील फुकट नाना येल्लेवार उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने