Top News

आरोग्य यंत्रणेचे यश; जाणून घ्या कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू न झालेला 'चंद्रपूर पॅटर्न'

सर्वत्र कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी चंद्रपूर जिल्हा मात्र याला अपवाद ठरलेला आहे.
Bhairav Diwase.    July 15, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- राज्यात सर्वत्र कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी चंद्रपूर जिल्हा मात्र याला अपवाद ठरलेला आहे. रुग्णांची संख्या दोनशेवर गेली असली तरी या जिल्ह्यात आजवर कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. एवढेच काय तर एकाही रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्याचीसुद्धा पाळी आली नाही. ही बाब यासाठी अहोरात्र राबणाऱ्या जिल्हा यंत्रणेचे निश्चितच मनोबल वाढवणारी आहे. योग्य नियोजन आणि काटेकोर अंमलबजावणी हे जिल्हा यंत्रणेच्या प्रयत्नांचे फलित आहे. चंद्रपूरचा हा पॅटर्न निश्चितच राज्याचा आदर्श प्रयोग ठरलेला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने