कृषी अधिकारी, कृषी साहाय्यक यांचे दुर्लक्ष.
Bhairav Diwase. Aug 28, 2020
चिमूर:- चिमूर तालुक्यात सध्या सोयाबीन,धान, कापूस अश्या सर्वच पिकांवर रोगाचे थैमान सुरू आहे सोयाबीन पिकांवर चक्रीभोंगा, लष्करी अडी, धान पिकांवर कडपा, तर कापूस पिकावर मावा,अडी असे रोग आहेत त्यामुळे शेतकरी रोगाचे नियंत्रण व्हावे म्हणून कीटकनाशके खरेदी करण्यासाठी कृषी केंद्रामार्फत विविध प्रकारची कीटकनाशके शेतकरी खरेदी करत आहेत परंतु प्रत्येक दुकानात किमतीत अनियमितता दिसत आहे एकाच वस्तू चे दर प्रत्येक दुकानांत वेगवेगळे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे.
बाजारात शेकडो कंपन्यांनी किटकनाशक औषध विक्रीसाठी आणले आहे काही औषधी फवारणी केल्यास शेतकऱ्यांना फायदा पण होत नाही अश्या औषधांचे सँपल तपासूनच कृषी विभागाने तालुक्यातील कृषिकेंद्रात विक्रीसाठी परवानगी घ्यायला पाहिजे परंतु कृषी अधिकारी यांना व्यवस्थित चिरीमिरी मिळत असल्याने त्याकडे दुर्लक्ष होत आहे.सध्या शेतकरी उलाला,सुप्रीम, कोऱ्याजन,फ्रॉफोनाफास सायपरमेथीन अश्या अनेक कीटकनाशक यांची फवारणी करत आहेत परंतु प्रत्येक कृषिकेंद्र याची विक्री वेगवेळ्या किमतीत करत आहेत त्यामुळे नेमकी खरी किंमत किती असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे.त्यामुळे संबंधित कृषी अधिकारी यांनी प्रत्येक कृषिकेंद्रामधील कीटकनाशक साठा तपासणी करून औषधे शेतकऱ्यांना योग्य दरात उपलब्ध करून द्यावी व बेभाव विक्री करणाऱ्या कृषी केंद्रावर कारवाई कारावी अशी मागणी शेतकऱ्यांनाकडून केली जात आहे.