MQL फाउंडेशन कडून पूरग्रस्तांना मदतीचा हात.

Bhairav Diwase
Bhairav Diwase.    Sep 07, 2020
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
ब्रम्हपुरी:- महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्याचे सदस्य असलेल्या "MQL FOUNDATION" तर्फे वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे  उध्वस्त झालेल्या कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंची किटचे वितरण करण्यात आले.चंद्रपूर जिल्ह्यामधील ब्रम्हपुरी तालुक्यात पूरग्रस्त गावे कीन्हीं, हरदोली व चिखलगाव येथील  अत्यंत गरजवंत कुटुंबाना अन्नधान्याच्या ३५ किटचे वाटप करण्यात आले.  किटमध्ये जीवनावश्यक तेल, साखर, पत्ती, तांदूळ, डाळ,साबण, निरमा, तिखट, मीठ, हळद, बेसन,मसाला,कांदा, लसूण, बटाटे इत्यादी देऊन कुटूंबाना मदत करण्यात आली.
         यावेळी "MQL FOUNDATION" चे संस्थापक सदस्य श्री बालाजी ठाकरे सर व श्री आतिष धोटे सर ,कीन्ही चे सरपंच अभयजी कूथे, हरदोली चे सरपंच सौ. भूमिका गौतम मेश्राम, चिखलगावचे सरपंच सौ पुष्पा पुरुषोत्तम धांडे , कल्पना अभ्यासिका मधील अभ्यास करणारे विद्यार्थी उल्हास राऊत, योगेश निकुरे, रंजित मरस्कोले, दीपक बागडे हे उपस्थित होते. किट वाटप करतांना श्री गिरीधर पात्रे हरदोली आणि मुकेश ढोरे चिखलगाव यांचे विशेष सहकार्य लाभले.
    "MQL FOUNDATION" च्या तात्काळ मदतीमुळे पूरग्रस्त कुटुंबांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून आला.अशा या कठीण प्रसंगी विविध संघटनांनी मदतीचा हात पुढे करून पूरग्रस्त कुटुंबाना मदत करावी आणि त्यांचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन "MQL फॉउंडेशनच्या"वतीने संस्थापक  सदस्य श्री अतिष धोटे यांनी केले.