प्रार्थनास्थळं उघडली नाही तर अराजकता वाढेल.
संतश्री मनिष महाराज यांचे प्रतिपादन.
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य संपादक) भैरव डी दिवसे जिल्हा चंद्रपूर
चंद्रपूर:- मंदिराजवळ सर्व क्षेत्राचे ज्ञान असते.म्हणून प्रार्थना स्थळं नेहमी ऊर्जा देतात.भिकारी ला देखील मंदिराबाहेर दान मिळते,त्याची उपजीविका यावर असते.परंतु आता कोरोनामुळे सर्व प्रार्थनास्थळं बंद आहेत. महाराष्ट्र शासनासने मंदिर उघडले नाही तर चोरी,लूटपाटच्या घटनेत वाढ होऊन अराजकता वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.असे प्रतिपादन भाजपा आध्यात्मिक समन्वयआघाडी महाराष्ट्र प्रदेशचे विशेष निमंत्रित सदस्य संतश्री मनीषभाई महाराज यांनी केले.
ते आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात भागवत धाम,श्री स्वामीनारायण मंदिराच्या प्रांगणात मंगळवार(१३ ऑक्टोबर)ला आयोजित लाक्षणिक उपोषण आंदोलनाचे नेतृत्व करतांना बोलत होते.
यावेळी मंचावर माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, अध्यात्मिक आघाडी च्या विदर्भ सहसंयोजक शिल्पा देशकर, जि.प. अध्यक्ष संध्या गुरनुले,महापौर राखी कांचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, भाजपा नेते विजय राऊत,प्रमोद कडू, राजेंद्र गांधी, प्रकाश धारणे, नगरसेवक सुभाष कासंगोट्टूवार,राजेंद्र खांडेकर,प्रशांत विघ्नेश्वर,ब्रिजभूषण पाझारे,भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर,गायत्री शक्तिपीठ चे डॉ.शैलेंद्र शुक्ला, नारायण प्रसाद रानडे,अरविंद तिवारी,पतंजली योग सेवा समितीचे राजकुमार पाठक, महाकाली मंदिरचे सुनील महाकाले,गुरुदेव सेवा मंडळचे अण्णाजी ढवस, विजय चिताडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
संतश्री मनीष महाराज म्हणाले, सृष्टी निर्माण झाली तेव्हापासून मंदिर बंद करण्याची पाळी कधीच आली नाही. राज्यशासनाने कोरोना असताना मदिरालयसह सगळं सुरू केलं,पण आमचे शक्ती केंद्र असणारे मंदिर-प्रार्थनास्थळे बंदच ठेवली.कोरोना आचार संहिता लावून प्रार्थनास्थळे मोकळी करायला पाहिजे होती परंतु ते झालेलं नाही. मंदिरामध्ये सर्व समाजाला आश्रय देण्याचं सामर्थ्य आहे.परंतु दुर्दैवाने मंदिर उघडण्यासाठी संतांना उपोषण करावे लागत आहे. संतांचे कार्य उपोषण करणे नसून उपासना करणे आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
यावेळी बोलताना हंसराज अहिर म्हणाले, मंदिरं ही संस्कार केंद्र आहेत. मंदिरात आम्हाला संस्कार मिळतात. त्यामुळे पूर्वीच्या राजांनी मंदिरे बांधली.संस्कृती टिकवण्यासाठी संतांनी लढा दिला.हा मंदिरांचा देश आहे. अध्यात्मिक दैवीशक्ती हीच आमची ओळख आहे. मंदिरात जाण्यास मिळत नसल्याने, आम्ही अपराधी तर नाही ना..? असे वाटू लागले आहे. शासनाने धार्मिक भावनांची हत्या करू नये असेही ते म्हणाले. यावेळी राखी कांचर्लावार, संध्या गुरनुले,राजेंद्र गांधी, प्रमोद कडू, शैलेंद्र शुक्ला आदी मान्यवरांनीं मार्गदर्शन करीत मंदिर उघडण्याची मागणी लावून धरली.राज्य शासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी पण करण्यात आली. शिवाजीनगर येथील गुरुदेव सेवा महिला भजन मंडळाने भजन सादर केले. यासाठी कल्पना गिरडकर, शालिनी वाढई,उषा मेश्राम, राधा आवारी, बयाबाई निकोडे यांनी पुढाकार घेतला.
यावेळी नगरसेवक संजय कांचर्लावार,सविता कांबळे,छबु भमेश्राम,शीला चव्हाण,देवानंद वाढई,सोपान वायकर भाजयुमोचे सुरज पेदुलवार, प्रज्वलंत कडू, राकेश बोमनवार, सुनील डोंगरे, यश बांगडे, कुणाल गुंडावार ,स्नेहील लांजेवार, श्रीकांत येलपुलवार, प्रतिक अगरकर ,मनीष पिपरे, राहुल पिदूरकर यांनीही लाक्षणिक उपोषण केले.प्रास्तविक सुभाष कासंगोट्टूवार यांनी तर संचालन प्रशांत विघ्नेश्वर यांनी केले.विशाल निंबाळकर यांनी आभार मानले.