बिबट्याने गोठ्यात घुसून केला हल्ला.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) धनराज कोहळे रैयतवारी (जांब), सावली
सावली:- सावली तालुक्यातील पांढरसराड येथील गोठ्यात शिरून बिबट्याने एक नाही, दोन नाही तर तब्बल 10 शेळ्यांचा जीव घेतला. रात्रोच्या सुमारास पांढरसराड येथील सागर रामिडवार यांच्या शेळ्यांच्या गोठ्यात शिरून बिबट्याने त्यांच्या 10 शेळ्यांच्या नरडीचा घोट घेतला. त्यामुळे त्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. जंगलात तर जीवघेणा हल्ला होत राहतोच परंतु आता गाव तसेच घर सुध्या सुरक्षित राहिले नाही. आजकाल बिबट असो की वाघ आता गावात, घरात, गोठ्यात घुसून शिकार करायला लागले आहेत. 

1) बल्लारपूर शहरात क्षुल्लक कारणातून युवकाची हत्या.

2) शेतीच्या वादातून युवकाची हत्या. 

3) शेतमजुरांची हत्या करून अर्धनग्न अवस्थेत टाकला मृतदेह. 
https://www.adharnewsnetwork.com/2020/11/blog-post_967.html?m=1

परंतु वनविभाग याकडे किती लक्ष देते हे समजणे कठीण होत आहे. गावकरी आता स्वतःच्या जीवाचे रक्षण करतील की आपल्या पाळीव प्राण्यांचे रक्षण करतील. जर घरात सुध्या सुरक्षितता नसेल तर मग काय करावे हा सवाल नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे. आता झालेली नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी आणि रामिडवार कुंटुंबाला आर्थिक मदत वनविभागाने देऊन सहकार्य करावे ही मागणी गावकरी करीत आहेत.