(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुक्यातील माथरा या गावात ओबीसी समन्वय समिती तर्फे सर्व तरुण युवक यांच्या पुढाकाराने ओबीसी जनगणनेच्या जनजागृती साठी पाटी लावा मोहीम राबविण्यात आली. यात तरुण युवकांनी घरोघरी फिरून १२० पाट्या लावून गावातील लोकांमधे ओबीसी जनगणेबद्दल जागृती केली. त्याचप्रमाणे जातनिहाय जनगणना, ओबीसी आरक्षणासाठी २६ नोव्हेंबर २०२० रोजी होणाऱ्या ओबीसींच्या विशाल मोर्चात सहभागी होण्यासाठी गावात घरोघरी फिरून लोकांना आवाहन केले. या आवाहनाला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. तसेच ठीक - ठिकाणी ओबीसी चे बॅनर लावण्यात आले.
गेल्या नव्वद वर्षापासून ओबीसी प्रवर्गाची जातनिहाय जनगणना झाली नाही. सन १९३१ नंतर भारतात ओबीसी जनगणना झाली नसून, ओबीसी समाजाची अधिकृत आकडेवारी आजपर्यंत कळली नाही आणि त्यामुळे ओबीसी समाज हा शासन दरबारी वंचित आहे. ओबीसी समाज हा भारताच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ५० ते ६० टक्के असूनही भारतीय व्यवस्थेच्या प्रत्यक्ष कार्यप्रणाली मध्ये सहभागी करुन घेतले जात नाही.
ओबीसी प्रवर्गाची जनगणना झालीच तर शासनाच्या विविध योजना, विभागीय कार्यालय उदाहरणार्थ शैक्षणिक, औद्योगिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय याठिकाणी हक्क अधिकार देणे क्रमप्राप्त ठरते. म्हणून ओबीसी जनगणना होणे आवश्यक आहे. यासाठीच माथरा येथील तरुण मंडळीने पुढाकार घेऊन पाटी लावा मोहीम सुरू करून जागृती केली.
यात करन झाडे (ओबीसी समन्वय समिती राजुरा तालुका कोष्याधक्ष्य ) ,दीपक चाहरे ,सचिन लांडे , कुणाल झाडे , ज्ञानेश्वर धोटे, तुषार क्षीरसागर, अनिकेत झाडे, सुधीर झाडे, आदेश वैध, चेतन वांढरे, शुभम वांढरे, अक्षय ताजने, रितेश वैध, गणेश वाडस्कर, गौरव राखुंडे यासह गावातील इतर तरुणांनी, गावातील नागरिकांनी सहकार्य करून ओबीसी जागृती यशस्वी केली..