आरोग्य विभागाची परिक्षा रद्द होणे म्हणजे सरकार कडुन बेरोजगारांची थट्टा. #Healthdepartment

Bhairav Diwase
फार्मसी कृती समिती चंद्रपूरचे जिल्हा सचिव सुरज गव्हाने यांचे मत 


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- 25-26 ला होणारी आरोग्य विभागाची भरती रद्द करणे म्हणजे महाविकास आघाडी सरकार च अपयश आहे असला प्रकार हा आत्ताच च नसुन मागच्या भरतीत सुद्धा घडला होता अगोदर भरती घोषित करायची विद्यार्थ्यांना सर्व रितीने सर प्रकिया करायला लावायची त्याचा कडुन फी स्वरुपात पैसे वसुल करायचे आणी वेळेवर रद्द करुन विद्यार्थीची थट्टा करायची मोठ्या आशेने ही पद भरती निघाली म्हणुन शेकडो विद्यार्थ्यांनी तयारी ला सुरवात केली मेहनत करुन अभ्यास करुन दिलेल्या परिक्षा केंद्रावर दाखल झाले काही विद्यार्थी 300-400 की. मी. वरुन परिक्षा केंद्रावर पोहचले मात्र सरकार च्या भोंगळ्या कारभारा मुळे परीक्षेच्या 1 दिवसा अगोदर परिक्षा रद्द म्हणून निवेदिका काढता म्हणजे हे बेरोजगार युवकांन सोबत थट्टा केल्यासारखे आहे आता तरी सरकार लवकरात लवकर समोरील तारीख निश्चित करून विद्यार्थ्यांनचे होणारे नुकसान टाळावे अशी विनंती आम्ही फार्मसी कृती समिती चंद्रपूर च्या वतीने करतो.#Healthdepartment