(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) पौर्णिमा फाले, सावली
सावली:- सध्या लाॅकडाउन असल्यामुळे सावली तालुक्यातील बस सेवा पुर्णता बंद आहे त्याचा फटका ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थी यांना बसत होता. सावली तालुक्यातील वर्ग ८ ते १२वी पर्यन्त शाळा सुरु झाले असल्याने ग्रामीन भागातील शालेय विद्यार्थी सावली तालुक्याच्या ठिकाणी शाळेच्या वेळेवर ये जा करावे लागते. #Saoli #saolinews
तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना विविध कामा करीता,शेति निविष्ठा खरेदी,आरोग्या करिता दवाखाना तसेच शेतमाल व धान्य विक्री,विविध कामा करीता तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. बस सेवा बंद असल्यामुळे सदर बाबीचा फटका विद्यार्थी व शेतकरी शेतमजुरास. सामान्य नागरिकास बसत होता, कारण सामान्य माणसाजवळ स्वतःचे वाहन नसल्यामुळे शेतकरी वर्गाला मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे तसेच सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे दोन चाकी वाहनानि जाने-येणे करू शकत नाही. #Adharnewsnetwork
करीता एस.टी. महामंडळा मार्फत मुल सावली ते हरांबा उपरी मार्ग गडचिरोली केरोडा चांदलयाप्रमाणे शालेय वेळेवर बस सेवा तातडीने सुरू करावी अशी मागणी, सामाजिक कार्यकर्ता, ग्रामपंचायत सदस्य तथा तंटामुक्ती अध्यक्ष राकेश गोलेपल्लीवार यांनी केलेली होती. तसे महामंडळ गडचिरोली आगार प्रमुख यांचेशी चर्चा करुन माहीती दिली असता आगार प्रमुखानी त्यांची दखल घेत सावली हरांबा रोडवरील शालेय बस सुरु करुन विध्यार्थाना योग्य शोलेय वेळेवर जाण्याकरीता बसेच सुरू केले असल्याने विद्यार्थ्यांन मध्ये आनंदमय होत असुन सामाजिक कार्यकर्ता ग्रामपंचायत सदस्य तथा महात्मा गांधी तंटामुक्ती समीती अध्यक्ष राकेश गोलेपल्लीवार यांच्या मागणीला अखेर यंश आल्याने शालेय विद्यार्थांनी राकेश गोलेपल्लीवार व आगार प्रमुख गडचिरोली यांचे आभार मानले आहेत.