सलग तिसऱ्या दिवशी युवा मोर्चाच्या वतीने मदत कार्य सुरू #ballarpur
बल्लारपूर शहरातील ग्रामीण रुग्णालयाच्या मागे शांतीनगर वस्ती मध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या असल्याचे लक्षात येतात भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांनी तिथे त्वरित धाव घेऊन बल्लारपूर नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी श्री.काटकर साहेब यांच्याशी फोनवर संपर्क करून टँकरच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच गणपती वार्डात हॅन्ड पंप बोरिंग बंद असल्याचे कळताच बल्लारपूर नगरपालिकेचे संबंधित विभागाचे अधिकारी श्री.खामणकर साहेब यांच्याशी फोनवर संपर्क करून बंद असलेल्या बोरिंगची दुरुस्ती करून नागरिकांना पाण्याची सोय उपलब्ध करून दिली.
यावेळी प्रसार माध्यमांची बोलताना श्री.आशिष देवतळे यांनी सांगितले की जोपर्यंत बल्लारपूर शहरातील नागरिकांच्या घराच्या झालेल्या नुकसानाचे पंचनामे होत नाही व सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी दूर होत नाही तोपर्यंत भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता हा जनतेच्या हाकेला धावून जाईल आणि मदतीचा हात देईल अशी प्रतिक्रिया यावेळी दिली. याप्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते तेजिंदर सिंग दारी, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष मोहित डंगोरे,युवा नेते गणेश कुंडे तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत