राज्य निवडणूक आयोगाचे दि. ०५/०७/२०२२ रोजीच्या पत्रान्वये २५ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत २८४ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूका २०२२ करिता आरक्षण सोडतीचा कार्यक्रम देण्यात आला आहे. परंतु मा. सर्वोच्च न्यायालयातील दाखल विशेष अनुमती याचिका क्र. १९७५६/२०२१ मध्ये राज्य शासनाने दाखल केलेल्या अर्जावर आज दि. १२/०७/२०२२ रोजी सुनावणी झाली असून एका आठवड्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे.
सदर पार्श्वभूमीच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, आयोगाचे दि. ०५/०७/२०२२ रोजीच्या आदेशान्वये देण्यात आलेला जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडत कार्यक्रम तूर्त स्थगित करण्यात येत आहे. यासंदर्भात सुधारीत आरक्षण सोडत कार्यक्रम यथावकाश देण्यात येईल.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत