Top News

भांडणाच्या रागात बारा वर्षीय मुलाने घेतला गळफास #suicide #chandrapur#chimur



चिमूर:- चिमूर तालुक्यातील खुटाळा येथील एका १२ वर्षीय मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दि. ५ डिसेंबरला दु. २ वाजताच्या सुमारास घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहीती नुसार दोन संख्ये भाऊ अंगणात खेळत असतांनी भांडण झाले. यात गौरव विलास गावतुरे (१२) रा. खुटाळा याचा राग अनावर झाल्याने गौरव याने स्वतःचे घरी दरवाजा लावून गळफास लावला. मोठ्या भावानी आरडाओरडा केला व दरवाजा काढून बघीतले असता गौरव याने गळफास घेतलेला होता. त्याला चिमुर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले.

गौरव हा सहाव्या वर्गात शिकत होता. घटनेचा पंचनामा पोलीस उपनिरीक्षक अलीम शेख, शंकर बोरसरे यांनी केला. घटना स्थळास ठाणेदार मनोज गभने यांनी भेट दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने