Top News

बळीराजाला बळ देणारा अर्थसंकल्प:- डॉ.‌ मंगेश गुलवाडे #chandrapur

*

चंद्रपूर:- छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष. या महोत्सवासाठी शासनाने 350 कोटी रुपयांची तरतूद केली हेच नाहीतर शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी व्यवस्थित नियोजन केले आहे.हा अर्थसंकल्प बळीराजाला बळ देणारा आहे.

राज्यशासन आंबेगाव (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान, मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावरील उद्यान तर शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय. शिवकालिन किल्ल्यांचे संवर्धन करणार आहे.यामुळे महाराष्ट्राची मान उंचावणार आहे.
अमृतकाळातील हा पहिला अर्थसंकल्प 'पंचामृत' ध्येयावर आधारित आहे.
शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास, भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास, रोजगारनिर्मिती सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा
, पर्यावरणपूरक विकास हे ध्येय या अर्थसंकल्पातुन स्पष्ट होत आहे.

शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता

12,000 रुपयांचा सन्माननिधी

- नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये प्रतिवर्ष बळीराजाला मिळणार.

याचा लाभ 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना होणार
शेतकऱ्यांना केवळ 1 रुपयांत पीकविमा. आता शेतकऱ्यांवर कोणताच भार नाही. राज्य सरकार भरणार हप्ता त्यामुळे
3312 कोटी रुपये भार राज्य सरकार उचलणार आहे.महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महाकृषिविकास अभियान,तालुका, जिल्हानिहाय शेतकरी गट, समूहांसाठी योजना. एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा शासन तयार करणार.5 वर्षांत 3000 कोटी रुपये उपलब्ध करून दिले जाणार असतांन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनांचे लाभ देखील मिळणार आहे.
2017 च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील उर्वरित पात्र शेतकऱ्यांना योजनेचे लाभ देण्याची घोषणा हे महत्वाचे पाऊल असून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभ या सरकारने दिले.12.84 लाख पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 4683 कोटी रुपये थेट जमा केल्याने बळीराजा सुखावला आहे.हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांच्या हिताचा आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने