दूध विक्री करून परतताना ट्रकने चिरडले, शेतकरी ठार #chandrapur #gadchiroli #accident

Bhairav Diwase
0

गडचिरोली:- दूध विक्री करून गावी परतताना शेतकऱ्याच्या दुचाकीला ट्रकने चिरडले. यात शेतकरी जागीच ठार झाला. ही घटना ५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता शहराजवळील आरमोरी रस्त्यावरील कठाणी नदीच्या पुलावर घडली.

मारोती भोयर (५५, रा. महादवाडी ता. गडचिरोली) असे मृताचे नाव आहे. त्यांचा शेतीसह दुग्धव्यवसाय आहे. नित्याप्रमाणे ५ फेब्रुवारी रोजी सकाळी घरोघरी जाऊन ग्राहकांना दूध वाटप केल्यानंतर गुरांसाठी पशुखाद्य खरेदी केले. पेंडीचे पोते व कॅन घेऊन ते दुचाकीवरून ( एमएच ३३ एए- ३७७७) गावी परतत होते. आरमोरी मार्गावरील कठाणी नदीच्या पुलावर पाठीमागून आलेल्या मालवाहू ट्रकने (एमएच ३३ डब्ल्यू-२७८६) दुचाकीला जोराची धडक दिली. यानंतर मारोती भोयर हे खाली कोसळले. ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर गडचिरोली पोलिसांनी धाव घेतली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)