चंद्रपूर: तीव्र उन्हात काय करावे व काय करू नये #chandrapur


चंद्रपूर:- हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज 5 एप्रिल रोजी चंद्रपूर शहरात दिवसा तसेच रात्रीही उष्णतेची लाट राहणार असून याबाबत यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, तीव्र उन्हात काय करावे व काय करू नये याबाबत मनापा प्रशासनाने स्पष्ट केले आहे

यलो अलर्टच्या कालावधीमध्ये भर उन्हात म्हणजे साधारणतः दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत उन्हात जाणे टाळावे. कमी वजनाचे, सौम्य रंगाचे आणि सुटसुटीत कपड्यांचा वापर या दिवसांमध्ये करावा.
उन्हामुळे फार घाम येत असल्याने शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं, ते कायम राखण्यासाठी या दिवसांमध्ये अधिक पाणी प्या.

दारु, चहा, कॉफी, सोडा असणारी शीत पेयांचं सेवन टाळा. या पदार्थांमुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं.

घरगुती पेय ज्यामध्ये लस्सी, ताक, लिंबूपाणी, तोरणी (तांदळाचं पाणी), आंब्याचे पन्हे, नारळ पाणी यासारख्या गोष्टींची सेवन केल्यास डिहायड्रेशन होत नाही.

डोक्यावर टोपी किंवा स्कार्फ किंवा रुमाल बांधावा. उन्हात डोकं उघडं राहणार नाही याची काळजी घ्यावी.

लहान मुलं, वयस्कर व्यक्ती तसेच आरोग्य विषयक समस्या असणाऱ्यांची विशेष काळजी या दिवसांमध्ये घ्यावी.

थंड जागेत, वातावरणात राहावे तसेच थंड पाण्याने अंघोळ करावी.

शिळे अन्न व उच्च प्रथिने असलेले पदार्थ खाणे टाळावे.

उन्हात प्रवास करताना डोळ्यांना गॉगल लावा, टोपी, छत्री यांचा वापर करावा.

उष्माघाताची लक्षणे

अस्वस्थपणा, थकवा येणे, शरीर तापणे, अशक्तपणा, अंगदुखी, डोकेदुखी, मळमळणे ही लक्षणे आढळल्यास थंडगार पाण्याने अंघोळ करावी. ( डोक्यावरून गार पाण्याने अंघोळ केल्याने तापलेले शरीर थंड होण्यास मदत होते ) थंड जागेत आराम करावा, परिश्रमाचे काम करू नये, भरपूर थंड पाणी प्यावे, तसेच मनपा आरोग्य केंद्रात किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयात त्वरित औषधोपचार करवून घ्यावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या