Murder News: चाकूने सपासप वार करून तरुणाची हत्या

Bhairav Diwase

चंद्रपूर:-
चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यात काल रात्री दहा वाजताच्या सुमारास एका 28 वर्षीय तरुणाची चाकूने सपासप वार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. रितिक अनिल शेंडे असे मृतक व्यक्तीचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे कि, चंद्रपूर जिल्ह्यातील मुल शहरामध्ये 28 वर्षीय रितिक अनिल शेंडे नामक युवक पंचायत समिती जवळ असलेल्या नगर परिषदने बनवलेल्या बस स्टॅन्ड च्या बाजूला दुचाकी ठेऊन मोबाईल वर बोलत असतांना 3 ते 4 जण येऊन रितिक वर चाकूने छातीवर आणि कमरेवर सपासप वार करून रक्त बंबाळ केले. तो खाली कोसळला. मारेकरी यावरच थांबले नाही. रस्त्यानी जात असलेल्या लोकांना चाकू समोर करून धमकावत होते. "चलो जावो नही तो तुम्हे भी खत्म कर देंगे" म्हणून चेतावणी दिले. भीतीने तिथे हजर असलेले लोक तहसील ऑफिस च्या गेट मध्ये गेले. घटनास्थळवरून मारेकरी पसार झाले.


या घटनेची माहिती संदीप आगडे यांना होताच ते आपल्या मित्रासह येऊन रितिक शेंडे याला उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत्य घोषित केले.

  

घटनेची माहिती मुल शहरात वाऱ्या सारखी पसरली आणि नागरिकांनी एकच गर्दी केली. तीन संशयित आरोपी असल्याचे पोलिसांनी माहिती दिली असून त्यांचे मोबाईल बंद येत असून त्यांच्या शोधात तीन टीम तयार केले असून आरोपीचा शोध सुरु आहे. शांतीप्रिय असलेल्या मुल शहरामध्ये गुन्हेगारी वाढत असून पोलीस प्रशासनावर रोष व्यक्त केल्या जात आहे. झालेल्या घटनेच्या निषेधार्थ मुल शहरात बंद ची हाक पुकारण्यात आली आहे.