अमरावती:- मागील सहा दिवसांपासून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचे आंदोलन (Bachchu Kadu) सुरू होते. अखेर आज सातव्या दिवशी बच्चू कडूंनी आंदोलन तुर्तास स्थगित केलं आहे. त्यांनी सरकारला 2 ऑक्टोबरची मुदत दिली आहे. उपोषणामुळे बच्चू (Maharashtra Politics) कडूंची प्रकृती खालावत होती.
आज उपोषणाचा सातवा दिवस
असून, अन्नाचा एकही कण त्यांच्या पोटात गेलेला नाही. त्यामुळे बच्चू कडूंची प्रकृती खालावत असल्याचं समोर येतंय. चार किलो वजन घटलं असून कार्यकर्त्यांची चिंता वाढली आहे. त्यांच्या या उपोषणाला माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी देखील पाठिंबा दिला आहे.
सरकारला मुदत देत बच्चू कडूंनी आंदोलन स्थगित
गेल्या 7 दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या बच्चू कडू यांच्या पोटात अन्नाचा एक कणही गेला नव्हता. त्यामुळे त्यांची प्रकृती प्रचंड खालावली होती. त्यांना रक्ताची उलटी देखील झाली होती. बच्चू कडूंची प्रकृती खालावल्यामुळे कार्यकर्त्यांमधून संताप व्यक्त होत होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात देखील त्यांनी मोठा राडा आज केला होता. न्याय मिळेपर्यंत थांबणार नाही, अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली होती. अखेर आज सरकारला मुदत देत बच्चू कडूंनी आंदोलन स्थगित केलंय.