चंद्रपूर:- चंद्रपूरमधून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे, जिथे एका निष्पाप जीवाचा बळी गेल्यानंतरच प्रशासनाला जाग आली आहे. ही घटना प्रशासनाच्या बेजबाबदार वृत्तीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करते.
दिनांक २ जुनला चंद्रपूर शहरातील तुकुम परिसरात सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास झालेल्या अपघातात २२ वर्षीय सानिका कुमरे लक्कडकोट तालुका राजुरा या युवतीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण चंद्रपूर शहर हळहळले आहे आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता.
भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकवरील चालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने हा गंभीर अपघात झाला. ही घटना टाळता आली असती, जर प्रशासनाने वेळेवर लक्ष दिले असते.
या घटनेनंतर, अर्थातच सर्वत्र ओरड सुरू झाली आहे. आता कुठे प्रशासनाला जाग आली असून, तुकूम परिसरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र, हा बदल एका निष्पाप जीव गेल्यानंतर का? हा प्रश्न नागरिक विचारत आहेत. या अपघाताची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
चंद्रपूरमधील ही घटना प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करते. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने अधिक जबाबदारीने आणि सक्रियपणे काम करणे अपेक्षित आहे.