मुल तालुक्यातील मारोडा येथील रहिवासी दिपक खोबरे यांच लाईट बिल ९,००० रुपये.
Bhairav Diwase. July 04, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) संजय मेकर्तीवार, मुल
मुल:- कोरोना संकटामुळे जनतेला आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. कोरोना मुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीत नागरिकांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. सलग तीन महिने लाॅक डाऊन पाळण्यात आल्याने अनेकांच्या हातचा रोजगार गेला अशात कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचे मोठे आव्हान नागरींका पुढे आहे. यातच भर म्हणून महावितरणाच्या वतीने तीन महिन्याचे विद्युत बिल नागरिकांच्या घरी पाठविले आहे.
आर्थिक संकटात नागरिक असताना वीज वितरण कंपनीने तीन महिन्याचे एकाच वेळी दिलेले बिल नागरिकांना भरणे शक्य नाही असा प्रश्न नागरिंकापुढे पडला असून तो अडचणीत सापडला आहे.
मुल तालुक्यातील मारोडा येथील रहिवासी दिपक खोबरे यांना लाईट बिल ९,००० रुपये आला आहे. चिंतेची बाब म्हणजे ते घर नविन बांधले आहे. वास्तविक पाहता त्या मीटरचा तो पूर्ण वापर केलेला नाही. व घराची लाईट फिटिंग पण झालेली नाही आहे. इतका मोठा लाईट बिल पाहून तो व्यक्ती चिंतेत पडलेला आहे. राज्य सरकारच्या मनमानी कारभार सुरू आहे अस दिसुन येत आहे. घरगुती मिटरची रिडींग न करता त्यांना तीन महिन्याच बिल पाठवले आहे. लाॅकडाऊन च्या काळामध्ये कुठलाही काम धंदा व रोजगार नसल्यामुळे जनसामान्य माणूस इतका मोठा लाईट बिल कसा भरणार. याची दक्षता राज्य सरकार आणि Mscb ऑफिस यांनी घेतली पाहिजे. व तात्काळ त्यांची चौकशी करून योग्य तो बिल देण्याचे करावे. अशी मागणी दिपक खोबरे यांनी केली आहे.