Top News

गडचिरोल- चंद्रपूर जिल्ह्याला जोडणारा आष्टी-गोंडपिपरी मार्ग आता दुसऱ्यांदा बंद.

आष्टी आणि गोंडपिपरी पोलिसांनी दुतर्फा आपापल्या पोलिस स्टेशनच्या वतीने नदीवर लावले बॅरिगेट्स.

प्रवासी वाहतूक थांबविण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात.
Bhairav Diwase. Aug 30, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- काल गोसीखुर्द धरणाचे पूर्ण दरवाजे सुरू केल्यामुळे आज वैनगंगा नदीची पातळी पूर्णपणे भरली आहे.यामुळे आष्टी पुलावर तब्बल ४ फूट पाणी आले आहे. अश्यातच गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्याला जोडणारा आष्टी-गोंडपिपरी मार्ग आता दुसर्यांदा बंद झाला आहे. लागलीच आष्टी आणि गोंडपिपरी पोलिसांनी दुतर्फा आपापल्या पोलिस स्टेशनच्या वतीने नदीवर बॕरिगेट्स लावले असुन प्रवासी वाहतूक थांबविण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

काही दिवसांपुर्वीच राज्यशासनाने लालपरिची विनापास जिल्हांतर्गत वाहतूक सुरु केली.यामुळे बर्याच दिवसांपासून रखडलेली ये-जा सुरु झाली. अश्यातच मात्र काल गोसीखुर्द धरणाचे पूर्ण दरवाजे सुरू केल्यामुळे आज वैनगंगेला पुर आला, परिणामी हा मार्ग बंद झाला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने