ग्राम पंचायत कडे रस्ता दुरुस्ती करीता निधीच नाही.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- गेल्या अनेक महिन्यांपासून रामपूर येथील जुन्या वसाहतीकडे ग्रामपंचायतिचे दुर्लक्ष होण्याच्या तक्रारी वाढत आहेत रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे नवीन वस्तीकडे ग्रामपंचायतीचे लक्ष आहे परंतु जुन्यावसाहतीकडे कडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झालेली आहे वारंवार ग्रामपंचायतीकडे तथा वार्ड मेंबर यांच्याकडे पाठपुरावा करून देखील रस्त्याचे अवस्था अत्यन्त बिकट आहे रस्ता दुरुस्तीचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून मागणी करून देखील होत नसल्याचे पाहून रामपुर वासियांनी सुरज ठाकरे यांना संपर्क केला, सुरज ठाकरे हेदेखील लवकरच रामपुर वासी होणार असल्याने त्यांनी देखील त्यांची व्यथा ऐकून घेतली व ग्रामपंचायतीशी संपर्क करून सोमवारपर्यंत जर या खराब रस्त्याबाबत ग्राम पंचायत तर्फे निर्णय लागला नाही तर ठाकरे स्वखर्चाने हा खराब रस्ता ठीक करून देईल असे वचन रामपूर वासियांना ठाकरे यांनी दिले. त्यामुळे रामपूर वासीयांनी देखील ठाकरे चे आभार मानले व त्यांच्या तात्काळ निर्णय देण्याच्या शैली बाबत आनंद व्यक्त केला.