उमेद अभियान चंद्रपूर जिल्ह्यातील कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांच्या सेवा समाप्ती करु नये:- सर्व उमेद कर्मचारी चंद्रपूर

Bhairav Diwase
Bhairav Diwase.    Sep 17, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय मेकर्तीवार, मुल
मुल:- सन 2011 पासून जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ( उमेद ) कार्यरत आहे. महिलाच्या आर्थिक , सामाजिक व राजकीय बदलाचे प्रतिक हे अभियान आहे. जवळपास जिल्ह्यातील 1 लाख 83 हजार 488 कुटुंबातील महिला या अभियानाला जोडल्या असून अजूनही 2 लाख कुटुंबाचे सामाजिक समावेशन करण्याची प्रक्रिया या अभियानातील कर्मचारी पार पाडत आहे. मात्र कोणतेही पूर्वसूचना न देता अचानक जिल्हातील वेगवेगळया पदावर कार्यरत कर्मचारी यांच्या सेवा अन्यायकारक पद्धतीने समाप्त केल्या आहे. त्यामुळे आम्ही कर्मचारी हे रस्त्यावर आले असून अशा कोविड च्या महाभयंकर काळात आमच्या कुटुंबाच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मोठ्या प्रमाणात कर्मचारी अभियानातून कमी केल्याने याचा परिणाम अभियानाच्या कामाव पडणार आहे व टप्प्याटप्याने सर्व कर्मचारी कमी होत आहे. त्यामुळे एवढे मोठ्या प्रमाणात दिलेले गारगरिबी निर्मूलनाचे व महिला सक्षमीकरणाची कामे कशा पद्धतीने पूर्ण करावी. असा प्रश्न निर्माण होतो. तेव्हा कृपया या अन्यायकारक निर्णय मागे घेऊन धोरणात्मक निर्णय होई पर्यंत कोणत्याही कर्मचाऱ्यांना कमी करू नये. अशी विनंती केली आहे.

    या करिता आधार न्यूज नेटवर्क मुल तालुका प्रतिनिधी यांना पत्र पाठवून. कृपया आपल्या स्तरावरून आम्हास न्याय मिळवून द्यावा. अशी विनंती करण्यात आली.

सर्व उमेद कर्मचारी, चंद्रपुर